शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

थंडीचा हळद, मक्यासह भाजीपाला पिकांना फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:50 IST

वाशिम/रिसोड : गत तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/रिसोड : गत तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे. रिसोड तालुक्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील हळद व मक्याची झाडे करपली असून, अन्य तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.सिंचनाची सुविधा उपलब्ध असणारे जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा या पारंपारिक पिकांबरोबरच हळद, मका व भाजीपालावर्गीय पिकेही घेतात. जिल्ह्यात दोन हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर हळद लागवड झालेली आहे. रिसोड तालुक्यात वाकद परिसर, मालेगाव तालुक्यात शिरपूर परिसरात हळदीचे लागवड क्षेत्र अधिक आहे. रब्बी हंगमात मका पीक देखील घेतले जाते. साधारणत: गत आठवड्यापर्यंत पोषक हवामान असल्याने हळद व मका या दोन्ही पिकांना ‘अच्छे दिन’ होते. परंतू, शनिवार, २९ डिसेंबरपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका या पिकांना जबर फटका बसला आहे. वाकद भाग दोनमधील हळद पिक दोन दिवसात करपून गेले आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हतबल झाले असून, कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी होत आहे. रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील शेतकरी बळीराम कुल्हाळ यांच्या शेतातील खरबूज पीकही थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. कुल्हाळ यांनी आधुनिक पद्धतीने शेतीची कास करून प्लास्टिक आच्छादनावर हे पीक घेतले होते. परंतु गत तीन दिवसात थंडीचा कडाका वाढल्यामुळे हे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. सदर पिकासाठी त्यांनी एकलासपूर धरणावरून पाईपलाईन सुद्धा केलेली आहे. वाकद तसेच एकलासपूर परिसरात शेडनेटमधील मिरची तसेच सिमला मिरची यासारखी पिके सुद्धा कोमेजून गेली आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक शेतकºयांचे वांगे, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसला आहे. आणखी दोन ते तीन दिवस थंडीचे प्रमाण  असेच राहिले तर हळद, मका यासह भाजीपालावर्गीय पिके संपूर्णत: हातातून जाण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. वाकद येथील शेतकरी विजय जटाळे यांनी शेडनेटमध्ये घेतलेले मिरचीचे पीक थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. जटाळे यांचा हा मिरचीचा ‘बिजवाई प्लॉट’ असल्यामुळे त्यांना खूप मेहनत करावी लागली आहे. नैसर्गिक संकटामुळे मिरचीचे नुकसान होत असल्याने शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी जटाळे यांनी केली. कडाक्याच्या थंडीत मका, हळद तसेच काही भाजीपालावर्गीय पिके तग धरू शकत नाहीत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडagricultureशेतीFarmerशेतकरी