शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

थंडीचा हळद, मक्यासह भाजीपाला पिकांना फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:50 IST

वाशिम/रिसोड : गत तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/रिसोड : गत तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे. रिसोड तालुक्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील हळद व मक्याची झाडे करपली असून, अन्य तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.सिंचनाची सुविधा उपलब्ध असणारे जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा या पारंपारिक पिकांबरोबरच हळद, मका व भाजीपालावर्गीय पिकेही घेतात. जिल्ह्यात दोन हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर हळद लागवड झालेली आहे. रिसोड तालुक्यात वाकद परिसर, मालेगाव तालुक्यात शिरपूर परिसरात हळदीचे लागवड क्षेत्र अधिक आहे. रब्बी हंगमात मका पीक देखील घेतले जाते. साधारणत: गत आठवड्यापर्यंत पोषक हवामान असल्याने हळद व मका या दोन्ही पिकांना ‘अच्छे दिन’ होते. परंतू, शनिवार, २९ डिसेंबरपासून तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका या पिकांना जबर फटका बसला आहे. वाकद भाग दोनमधील हळद पिक दोन दिवसात करपून गेले आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हतबल झाले असून, कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी होत आहे. रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील शेतकरी बळीराम कुल्हाळ यांच्या शेतातील खरबूज पीकही थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. कुल्हाळ यांनी आधुनिक पद्धतीने शेतीची कास करून प्लास्टिक आच्छादनावर हे पीक घेतले होते. परंतु गत तीन दिवसात थंडीचा कडाका वाढल्यामुळे हे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. सदर पिकासाठी त्यांनी एकलासपूर धरणावरून पाईपलाईन सुद्धा केलेली आहे. वाकद तसेच एकलासपूर परिसरात शेडनेटमधील मिरची तसेच सिमला मिरची यासारखी पिके सुद्धा कोमेजून गेली आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक शेतकºयांचे वांगे, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसला आहे. आणखी दोन ते तीन दिवस थंडीचे प्रमाण  असेच राहिले तर हळद, मका यासह भाजीपालावर्गीय पिके संपूर्णत: हातातून जाण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. वाकद येथील शेतकरी विजय जटाळे यांनी शेडनेटमध्ये घेतलेले मिरचीचे पीक थंडीमुळे उद्धवस्त होत आहे. जटाळे यांचा हा मिरचीचा ‘बिजवाई प्लॉट’ असल्यामुळे त्यांना खूप मेहनत करावी लागली आहे. नैसर्गिक संकटामुळे मिरचीचे नुकसान होत असल्याने शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी जटाळे यांनी केली. कडाक्याच्या थंडीत मका, हळद तसेच काही भाजीपालावर्गीय पिके तग धरू शकत नाहीत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडagricultureशेतीFarmerशेतकरी