शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अकोला-वाशिम महामार्गावरील पुलावरून ट्रक कोसळला; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:11 IST

संतोष राजू पाटिल (२३) व धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०), अशी मृतकांची नावे आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क मेडशी (वाशिम): अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून एक ट्रक उलटून दोन जण ठार झाल्याची घटना २७ जुलै सोमवार रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मेडशीनजीक घडली. संतोष राजू पाटिल (२३) व धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०), अशी मृतकांची नावे आहेत. मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातील इंदोर येथून आलेला एमपी-०९ एचएफ ६६४६ क्रमांकाचा मालवाहू ट्रक आंध्रप्रदेशातील चेन्नईकडे जाता होता. अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर पातूर येथून मालेगावकडे जाणाºया रस्त्यावरील पुलाजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक पुलावरून खाली कोसळला. या अपघातात ट्रक क्लीनर संतोष राजू पाटिल (२३) व ट्रक चालक धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०) हे दोघे ट्रकखाली दबले. मेडशी येथील पाईप फॅक्टरीच्या कामावर जात असलेले शेख नय्यूम बागवान यांना हा अपघात दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस कर्मचारी दत्तात्रय सुरोशे ,विलास गायकवाड सुरेंद्र तिखिले आदिंनी घटनास्थळावर पोहोचत ट्रकखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढले; परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाही. या प्रकरणी मालेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात