शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

उंबर्डाबाजार - दोनद मार्गावरील झाडे पाण्याअभावी कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:17 IST

उंबर्डाबाजार (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभागाकडून उंबर्डाबाजार ते मनभा, दोनद या आठ किमी अंतराच्या मार्गावर विविध प्रजातींची जवळपास आठ हजार झाडे लावण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डाबाजार (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभागाकडून उंबर्डाबाजार ते मनभा, दोनद या आठ किमी अंतराच्या मार्गावर विविध प्रजातींची जवळपास आठ हजार झाडे लावण्यात आली. मात्र, पाण्याअभावी अनेक झाडे कोमेजून जात असल्याने वृक्ष संवर्धन मोहिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी  मोठा  गाजावाजा करून  विविध  शासकीय  तथा निमशासकिय   संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात  वृक्ष लागवड  केली जाते. परंतु, लावलेल्या वृक्षांचे  संरक्षण  व संगोपन योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे लावलेली अनेक वृक्ष जीवंत राहू शकत नाही. वृक्ष लागवड मोहिमेवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो; मात्र त्या तुलनेत वृक्ष संवर्धन मोहिम फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याची बाब उंबर्डाबाजार ते दोनद या मार्गावरील कोमेजलेल्या झाडांवरून दिसून येते.  सर्वेक्षण, सिमांकन, खड्डे आखणी, जागेची साफसफाई, खड्डे खोदणे, खड्ड्यासभोवताल माती भरणे, बुरशीनाशक शेणखत, कंपोष्ट खत व किटकनाशक टाकने, रोपांची खरेदी, वाहतुक, लागवड यासह अन्य कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभाग कारंजा कार्यालयाच्यावतीने उंबर्डाबाजार, मनभा, दोनद या मार्गावर वृक्ष संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लावलेली काही झाडे जनावांनी फस्त केली आहेत तर काही झाडे पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. आठ हजार झाडांना पाणी देण्यासाठी केवळ सहा मजूर लावण्यात आले आहेत. तसेच केवळ दर्शनी भागातील झाडांनाच संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. अन्य झाडांना कोणतेही संरक्षण कवच नसल्याने ही झाडे जगणार की नाही याबाबत साशंकता वर्तविली जात आहे. या प्रकाराकडे सामाजिक वनीकरण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींतून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगल