शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

उंबर्डाबाजार - दोनद मार्गावरील झाडे पाण्याअभावी कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:17 IST

उंबर्डाबाजार (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभागाकडून उंबर्डाबाजार ते मनभा, दोनद या आठ किमी अंतराच्या मार्गावर विविध प्रजातींची जवळपास आठ हजार झाडे लावण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डाबाजार (वाशिम) : सामाजिक वनीकरण विभागाकडून उंबर्डाबाजार ते मनभा, दोनद या आठ किमी अंतराच्या मार्गावर विविध प्रजातींची जवळपास आठ हजार झाडे लावण्यात आली. मात्र, पाण्याअभावी अनेक झाडे कोमेजून जात असल्याने वृक्ष संवर्धन मोहिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी  मोठा  गाजावाजा करून  विविध  शासकीय  तथा निमशासकिय   संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात  वृक्ष लागवड  केली जाते. परंतु, लावलेल्या वृक्षांचे  संरक्षण  व संगोपन योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे लावलेली अनेक वृक्ष जीवंत राहू शकत नाही. वृक्ष लागवड मोहिमेवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो; मात्र त्या तुलनेत वृक्ष संवर्धन मोहिम फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याची बाब उंबर्डाबाजार ते दोनद या मार्गावरील कोमेजलेल्या झाडांवरून दिसून येते.  सर्वेक्षण, सिमांकन, खड्डे आखणी, जागेची साफसफाई, खड्डे खोदणे, खड्ड्यासभोवताल माती भरणे, बुरशीनाशक शेणखत, कंपोष्ट खत व किटकनाशक टाकने, रोपांची खरेदी, वाहतुक, लागवड यासह अन्य कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभाग कारंजा कार्यालयाच्यावतीने उंबर्डाबाजार, मनभा, दोनद या मार्गावर वृक्ष संवर्धनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लावलेली काही झाडे जनावांनी फस्त केली आहेत तर काही झाडे पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. आठ हजार झाडांना पाणी देण्यासाठी केवळ सहा मजूर लावण्यात आले आहेत. तसेच केवळ दर्शनी भागातील झाडांनाच संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. अन्य झाडांना कोणतेही संरक्षण कवच नसल्याने ही झाडे जगणार की नाही याबाबत साशंकता वर्तविली जात आहे. या प्रकाराकडे सामाजिक वनीकरण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींतून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमforestजंगल