शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एकिकडे वृक्षलागवडीसाठी आटापिटा; दुसरीकडे वृक्षसंवर्धनाकडे कानाडोळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:35 IST

वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आढावा घेतला   जात आहे तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने वृक्षतोडीवरून दिसून येते.

ठळक मुद्दे वाशिम ते अनसिंग, वाशिम ते मालेगाव या मार्गावर आग लावून जवळपास २० ते २५ वृक्षांची कत्तल करण्यात आली. यापूर्वी वाशिम ते मालेगाव या  मार्गावरील वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. वृक्षरोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींनी शुक्रवारी केली.

वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात वाशिम जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आढावा घेतला   जात आहे तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने वृक्षतोडीवरून दिसून येते. वाशिम ते अनसिंग, वाशिम ते मालेगाव या मार्गावर आग लावून जवळपास २० ते २५ वृक्षांची कत्तल करण्यात आली. 

पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्यभरात वृक्ष लागवड मोहिम राबविली जात आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. सन २०१६ आणि २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध प्रजातींचे जवळपास ५ लाख वृक्ष लागवड केली होती. येत्या १ ते ३१ जुलै या कालावधीतही १३.८८ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले. कोणत्या विभागाने किती वृक्ष लागवड करावी याचे नियोजन केले असून, जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यासाठी आढावाही घेतला जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन करण्यासाठी फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याने रस्त्यालगतच्या वृक्षांना आग लावून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याचे दिसून येते. वाशिम ते अनसिंग या मार्गावर आग लावून एका वृक्षाची कत्तल केल्याची बाब ३० मे रोजी उघडकीस आली. यापूर्वी वाशिम ते मालेगाव या  मार्गावरील वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. वृक्षरोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमींनी शुक्रवारी केली.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरण