शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तोरणाळा, म्हसणीवासी काढताहेत अंधारात रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 16:42 IST

इंझोरी (वाशिम): दापूरा वीज उपकेंद्रान्ला जोडलेल्या तोरणाळा आणि म्हसणी गावांत खंडीज वीज पुरवठ्याच्या प्रकाराचा कहर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): दापूरा वीज उपकेंद्रान्ला जोडलेल्या तोरणाळा आणि म्हसणी गावांत खंडीज वीज पुरवठ्याच्या प्रकाराचा कहर होत आहे. रात्रीला दररोज वीज पुरवठा खंडीत होत असल्याने येथील ग्रामस्थ रात्र अंधारात काढावी लागत आहे. महावितरण मात्र, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण सांगत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दापूरा वीज उपकेंद्रावरुन इंझोरी सर्कलमधील जवळपास १० ते १५ गावांना वीज पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या सर्कलमधील काही गावांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यात मानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या म्हसणी आणि तोरणाळा येथील वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी खंडीत झालेला वीज पुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत सुरळीत होत नाही. तर दिवसाला खंडीत झालेला वीज पुरवठाही १२ तास सुरळीत केला जात नाही. त्यामुळे पाणी पुरवठा योजना प्रभावित होऊन ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, तर पीठ गिरण्या बंद राहत असल्याने भात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. त्याशिवाय लघू उद्योगांवरही परिणाम होत असून, मोेबाईल रिचार्ज करण्यात अडचणी येत असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी संपर्क साधणेही ग्रामस्थांना कठीण झाले आहे. महावितरणकडे या संदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारही केली जाते; परंतु मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास विलंब लागतो, असे कारण महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे. 

दापूरा वीज उपकेंद्रांतर्गत वादळी वाºयामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. ग्रामस्थांना अडचणी येऊ नयेत म्हणून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्नही केले जात आहेत. एखादवेळी मनुष्यबळाच्या अभावामुळे तांत्रिक बिघाड दूर करण्यास विलंब होतो. त्यावरही तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-आशिष कुंभारेकनिष्ठ अभियंतावीज उपकेंद्र, दापुरा (ता.मानोरा)

तोरणाळा, म्हसणी येथील वीज पुरवठा १२ तास खंडीत ठेवला जातो. महावितरणकडे विचारणा केल्यानंतर अपुºया मनुष्यबळामुळे तांत्रिक बिघाड दूर करण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात येते. वीज पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा प्रभावित होत आहेच शिवाय पीठ गिरण्या बंद राहत असल्याने खिचडी खाऊन दिवस काढावे लागत आहे. - सिताराम बालूसिंग पवार सरपंच तोरणाळा, ता. मानोरा

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण