शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वाशिम जिल्हयातील तीनही मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:12 IST

 जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता मिटली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हयात असलेल्या ३  मध्यम व १३३ लघु प्रकल्पात जलसाठा बºयापैकी साठल्याने जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे. तीनही मध्य प्रकल्पासह ४६ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून उर्वरित लघुप्रकल्पातही ७५ टक्के व काहींमध्ये यापेक्षा जास्त जलसाठा निर्माण झाला आहे.सुरुवातील अत्यल्प पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही जिल्हावासियांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार असे चिन्ह दिसून येत होते. परंतु गत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या  जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता मिटली.यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला नव्हता.त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतांनाच गत पंधरा दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे  पाणी टंचाईची चिंता दूर झाल्याचे दिसून येत आहे. े सर्वत्र जोरदार पावसााने प्रकल्प तुडूंब भरले तर नदि, नाले दुथडी भरुन वाहू लागले. शिवाय भुगभार्तील पाणी पातळीत देखील वाढ झालेली दिसून येत आहे . जिल्हावासियांना जाणवणारी टंचाई दूर झाली असली तरी या पावसाने मात्र, शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान केल्याने त्यांच्यावर आर्थीक संकट कोसळलेले दिसून येत आहे. सर्वत्र पीक काढणीच्या तोंडावर झालेल्या पावसाने पीक नष्ट होवून बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.  जिलहयात झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प ओव्हर फ्लो तर अनेक प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असून  यामध्ये प्रामुख्याने एकबुर्जी, सोनल, अडाण हे तीन मध्यम प्रकल्प तुडूंब भरले असून वाशिम तालुक्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी ३० प्रकल्पांमध्ये, मालेगाव तालुक्यातील २३ पैकी २१, कारंजा तालुक्यातील १६ पैकी ६, मंगरूळपीर १५ पैकी ११, रिसोड तालुक्यातील १८ पैकी १३ तर मानोरा तालुक्यातील २५ पैकी १० प्रकल्प अशा एकूण १३३ लघु प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आजमितीला उपलब्ध झाला  आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण