शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील तीनही मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:12 IST

 जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता मिटली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हयात असलेल्या ३  मध्यम व १३३ लघु प्रकल्पात जलसाठा बºयापैकी साठल्याने जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे. तीनही मध्य प्रकल्पासह ४६ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून उर्वरित लघुप्रकल्पातही ७५ टक्के व काहींमध्ये यापेक्षा जास्त जलसाठा निर्माण झाला आहे.सुरुवातील अत्यल्प पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील १३४ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही जिल्हावासियांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार असे चिन्ह दिसून येत होते. परंतु गत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या  जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडूंब भरल्याने संभाव्य पाणीटंचाईची चिंता मिटली.यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला नव्हता.त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतांनाच गत पंधरा दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे  पाणी टंचाईची चिंता दूर झाल्याचे दिसून येत आहे. े सर्वत्र जोरदार पावसााने प्रकल्प तुडूंब भरले तर नदि, नाले दुथडी भरुन वाहू लागले. शिवाय भुगभार्तील पाणी पातळीत देखील वाढ झालेली दिसून येत आहे . जिल्हावासियांना जाणवणारी टंचाई दूर झाली असली तरी या पावसाने मात्र, शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान केल्याने त्यांच्यावर आर्थीक संकट कोसळलेले दिसून येत आहे. सर्वत्र पीक काढणीच्या तोंडावर झालेल्या पावसाने पीक नष्ट होवून बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.  जिलहयात झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश प्रकल्प ओव्हर फ्लो तर अनेक प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असून  यामध्ये प्रामुख्याने एकबुर्जी, सोनल, अडाण हे तीन मध्यम प्रकल्प तुडूंब भरले असून वाशिम तालुक्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी ३० प्रकल्पांमध्ये, मालेगाव तालुक्यातील २३ पैकी २१, कारंजा तालुक्यातील १६ पैकी ६, मंगरूळपीर १५ पैकी ११, रिसोड तालुक्यातील १८ पैकी १३ तर मानोरा तालुक्यातील २५ पैकी १० प्रकल्प अशा एकूण १३३ लघु प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आजमितीला उपलब्ध झाला  आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण