शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार; दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:15 IST

घटना धनज परिसरातील धनज-भिवरी आणि कामरगाव-लाडेगाव या मार्गावर १९ आॅगस्ट रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. (वाशिम) : दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तीन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धनज परिसरातील धनज-भिवरी आणि कामरगाव-लाडेगाव या मार्गावर १९ आॅगस्ट रोजी घडली. धनज-भिवरी मार्गावरील अपघातात सुभाष पांडुरंग टाके (६५) रा. अमरावती व प्रताप शामलाल मोहीते (३०) रा. पिंपळगाव तर कामरगाव-लाडेगाव मार्गावरील अपघातात प्रांजळ शंकरराव गजभिये (२६)  रा. लाडेगाव हे ठार झाले.एमएच २७ क्यू ७५८६ क्रमांकाच्या दुचाकीने मृतक सुभाष टाके व अभिजित सुभाष टाके (१९) हे धनज येथून भिवरीकडे १९ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येत होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीचा व टाके यांच्या दुचाकीचा धनज-भिवरी मार्गादरम्यान भीषण अपघात झाला. यामध्ये सुभाष टाके व प्रताप मोहिते हे दोघे ठार झाले तर अभिजित टाके हा गंभीर जखमी झाला. जखमीला धनज प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान धनज पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस करीत आहेत.दुसºया एका घटनेत दुचाकीची बैलाला धडक लागून प्रांजळ शंकरराव गजभिये यांचा मृत्यू झाला तर अमोल वसंतराव सवाई (३०) रा. लाडेगाव हा युवक गंभीर जखमी झाला. प्रांजळ गजभिये आणि अमोल सवाई हे दोघेजण १९ आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या ुसुमारास एमएच ३० क्यू ९९९२ क्रमांकाच्या दुचाकीने कामरगाव येथून लाडेगावकडे जात होते. कामरगावपासून दोन किमी अंतरावर दुचाकीची बैलाला जबर धडक लागली. या धडकेत प्रांजळ गजभिये ठार तर अमोल सवाई हा जखमी झाला. या घटनेची नोंद कामरगाव चौकितील पोलिसांनी घेतली असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कपील म्हस्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम व रविंद्र राजगुरे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात