शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पंचनाम्यासाठी उरले तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:19 IST

पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे कृषी व महसूल विभागासह पंचायत विभागाची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान, पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळून ते नुकसानाबाबत प्रशासनाला अवगत करु शकणार आहेत.जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनसह उभे सोयाबीन, तूर, कपाशी आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीत पाणीच पाणी दिसू लागले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. सुरुवातीचे दोन दिवस तक्रार अर्जांचे संकलन करण्यातच गेले, तर त्यानंतर पावसामुळे शेतशिवारात चिखल झाल्याने पंचनाम्यात अडथळे निर्माण झाले. आता ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांचे संयुक्त पथक पीक नुकसानाची पाहणी करीत आहे. जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी पीक विमा काढला. त्यात १ लाख ३० हजार ७५६ शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. या शेतकºयांनी १ लाख ३७ हजा २४ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा भरला आहे, तर त्यापैकी १ लाख ९ हजार ६०६ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाबाबत अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्य ८०२ गावातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी मंगळवार ५ नोव्हेंबरपर्र्यंत प्रशासनाने ३५२ गावांतील ९५ हजारांहून अधिक शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे केले आहेत. तथापि, हे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंतचीच मुदत दिली असल्याने आता तीन दिवसांत ४५० गावांत पोहोचून पंचनामे करावे लागणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. आता तीन दिवसांत कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला पंचनामे करावे लागणार आहेत. यात वेळ जाऊ नये म्हणून प्रशासन एका गावातील दहा ते पंधरा शेतकºयांच्या काढणी पश्चात सोयाबीनचा पंचनामा करून तो एकाच कागदावर नमूद करीत त्यावर संबंधित सर्व शेतकºयांची स्वाक्षरी घेत आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने पंचनामे झालेल्या गावांतील शेतकºयांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागांत फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे ज्या शेतकºयांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकºयांना प्रशासनाला आपल्या पीक नुकसानाबाबत अवगत करून पंचनामे करून घेता येणार आहेत.(प्रतिनिधी)शासनाच्या निकषानुसार प्रत्येक शेतकºयाच्या शेतात नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाचे पथक जात आहे. काही शेतकºयांच्या मनात सुरू असलेल्या नुकसानाच्या पंचनाम्याबाबत संभ्रम आहे; मात्र ही प्रक्रिया निप:क्षपणे केली जात असून कुणाला काही शंका असल्यास त्यांनी पथकाला भेटून शंका निरसन करावे.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पंचनामे निर्धारित मुदतीत करण्यापेक्षा कोणताच नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, ही काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्यबळ अपुरे असताना नियोजनबद्ध पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया पार पडत आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या सुड्या पूर्णत: भिजल्या असून, अधिक दिवस उलटल्याने सुड्यांमधील हे सोयाबीन आता सडत चालले आहे. असे असताना अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याने सोयाबीन उचलावे की नाही, हा प्रश्न आहे. प्रशासनाने सोयाबीनच्या सुड्यांचा तातडीने पंचनामा करायला हवा.- शाम अवताडेशेतकरी, जोगलदरी (ता.मंगरूळपीर)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती