शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पंचनाम्यासाठी उरले तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:19 IST

पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे कृषी व महसूल विभागासह पंचायत विभागाची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान, पंचनामे झालेली गावे आणि शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींच्या फलकावर लावण्यात येत आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळून ते नुकसानाबाबत प्रशासनाला अवगत करु शकणार आहेत.जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनसह उभे सोयाबीन, तूर, कपाशी आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीत पाणीच पाणी दिसू लागले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. सुरुवातीचे दोन दिवस तक्रार अर्जांचे संकलन करण्यातच गेले, तर त्यानंतर पावसामुळे शेतशिवारात चिखल झाल्याने पंचनाम्यात अडथळे निर्माण झाले. आता ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांचे संयुक्त पथक पीक नुकसानाची पाहणी करीत आहे. जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी पीक विमा काढला. त्यात १ लाख ३० हजार ७५६ शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. या शेतकºयांनी १ लाख ३७ हजा २४ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा भरला आहे, तर त्यापैकी १ लाख ९ हजार ६०६ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाबाबत अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्य ८०२ गावातील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी मंगळवार ५ नोव्हेंबरपर्र्यंत प्रशासनाने ३५२ गावांतील ९५ हजारांहून अधिक शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे केले आहेत. तथापि, हे पंचनामे करण्यासाठी शासनाने ८ नोव्हेंबरपर्यंतचीच मुदत दिली असल्याने आता तीन दिवसांत ४५० गावांत पोहोचून पंचनामे करावे लागणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. आता तीन दिवसांत कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला पंचनामे करावे लागणार आहेत. यात वेळ जाऊ नये म्हणून प्रशासन एका गावातील दहा ते पंधरा शेतकºयांच्या काढणी पश्चात सोयाबीनचा पंचनामा करून तो एकाच कागदावर नमूद करीत त्यावर संबंधित सर्व शेतकºयांची स्वाक्षरी घेत आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने पंचनामे झालेल्या गावांतील शेतकºयांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागांत फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे ज्या शेतकºयांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकºयांना प्रशासनाला आपल्या पीक नुकसानाबाबत अवगत करून पंचनामे करून घेता येणार आहेत.(प्रतिनिधी)शासनाच्या निकषानुसार प्रत्येक शेतकºयाच्या शेतात नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाचे पथक जात आहे. काही शेतकºयांच्या मनात सुरू असलेल्या नुकसानाच्या पंचनाम्याबाबत संभ्रम आहे; मात्र ही प्रक्रिया निप:क्षपणे केली जात असून कुणाला काही शंका असल्यास त्यांनी पथकाला भेटून शंका निरसन करावे.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पंचनामे निर्धारित मुदतीत करण्यापेक्षा कोणताच नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, ही काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्यबळ अपुरे असताना नियोजनबद्ध पद्धतीने पंचनाम्याची प्रक्रिया पार पडत आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या सुड्या पूर्णत: भिजल्या असून, अधिक दिवस उलटल्याने सुड्यांमधील हे सोयाबीन आता सडत चालले आहे. असे असताना अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याने सोयाबीन उचलावे की नाही, हा प्रश्न आहे. प्रशासनाने सोयाबीनच्या सुड्यांचा तातडीने पंचनामा करायला हवा.- शाम अवताडेशेतकरी, जोगलदरी (ता.मंगरूळपीर)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती