शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘त्या’ २६८ विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:54 IST

वाशिम: सन २0१0 आणि २0११ या दोन वर्षात घेण्यात आलेल्या ‘एनएमएमएस’ या शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ७ वर्षांपासून थकीत होती. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात सदर रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर नागरे यांनी दिली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता, हे विशेष.

ठळक मुद्देशिक्षण विभागाची माहिती ‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सन २0१0 आणि २0११ या दोन वर्षात घेण्यात आलेल्या ‘एनएमएमएस’ या शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ७ वर्षांपासून थकीत होती. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात सदर रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर नागरे यांनी दिली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता, हे विशेष.आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५00 रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, सन २0१0 आणि २0११ मध्ये वाशिम जिल्हय़ातील २६८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे नाव, शाळा, बँकेचे खाते क्रमांक आदी माहितीचा सविस्तर अहवाल शिक्षण विभागाच्या संचालकांमार्फत एनसीईआरटी, नवी दिल्ली यांच्याकडे वेळेत पोहचणे क्रमप्राप्त होते. मात्र, तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांच्या चुकीमुळे अहवालच वेळेत पाठविला गेला नाही. परिणामी, २६८ विद्यार्थ्यांना ४ वर्षांकरिता देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हय़ाला मिळाली नव्हती. मात्र आता हा प्रश्न निकाली निघाला असून, गेल्या काही दिवसांपासून शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम संबंधित विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी