शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बैठकीत तोडगा नाहीच; बियाणे उत्पादक शेतकरी आत्मदहनाच्या इशाऱ्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:36 IST

वाशिम : सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, ३० मार्च रोजी कृषी विभागाने ...

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात सन २०१० पासून सुमारे १८ शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळाने हजारो क्विंटल बियाणे उत्पादन करीत आहेत.अनुदान न मिळाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बियाणे उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी दिला. अनुदानासंदर्भात केवळ आश्वासन मिळाले असून, ठोस तोडगा न निघाल्याने चर्चेची ही प्राथमिक बैठक फिस्कटली.

वाशिम : सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, ३० मार्च रोजी कृषी विभागाने पुन्हा एकदा शेतकºयांची बैठक बोलाविली आहे.

शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठी अनुदान दिले जाते. गत सात वर्षांपासून बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठीचे अनुदान शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळांना अनुदान देण्यात येते. वाशिम जिल्ह्यात सन २०१० पासून सुमारे १८ शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळाने हजारो क्विंटल बियाणे उत्पादन करीत आहेत. आतापर्यंत बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळालेले आहे. पूर्वानुभव लक्षात घेता सन २०१६-१७ मध्ये ९९६.७० क्विंटल हरभरा बियाणे उत्पादन केले. त्यापोटी बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळणे अपेक्षीत आहे, असे शेतकरी उत्पादक गट व कंपन्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे निवेदन देत अनुदान देण्याची मागणी केली. यावर कोणताच सकारात्मक निर्णय न झाल्याने २२ मार्च रोजी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्र देत ३० मार्चपर्यंत अनुदान न मिळाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बियाणे उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी दिला. याची दखल घेत शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश कृषी, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव डॉ. किरण पाटील यांनी २६ मार्च रोजी वाशिम, बुलडाणा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले होते. या निर्देश पत्रात मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देण्यात आला. त्या अनुषंगाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बुलडाणा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, वाशिम येथील प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, ‘आत्मा’ कार्यालयाच्या प्रभारी प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपसंचालक आर.एस. कदम, तंत्र सहायक टी.पी. आरू आदींनी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी बियाणे उत्पादन करताना आलेल्या अडचणी व बँक, पतसंस्थेंकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळाले नाही तर कर्जाची परतफेड कशी करावी, अशी आपबिती शेतकऱ्यांनी कथन केली. या अनुदानासंदर्भात केवळ आश्वासन मिळाले असून, ठोस तोडगा न निघाल्याने चर्चेची ही प्राथमिक बैठक फिस्कटली. दरम्यान, ३० मार्च रोजी पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलाविण्यात आले आहे. या चर्चेत बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनी बाळखेड, बालाजी शेतकरी उत्पादक गट किनखेडा, संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, बाळनाथ शेतकरी उत्पादक गट, हरिओम शेतकरी उत्पादक कंपनी, देवळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी माऊली शेतकरी उत्पादक कंपनी, परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनी यासह बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ३० मार्च रोजीही ठोस तोडगा न निघाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशाऱ्यावर ठाम असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी