शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बैठकीत तोडगा नाहीच; बियाणे उत्पादक शेतकरी आत्मदहनाच्या इशाऱ्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:36 IST

वाशिम : सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, ३० मार्च रोजी कृषी विभागाने ...

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात सन २०१० पासून सुमारे १८ शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळाने हजारो क्विंटल बियाणे उत्पादन करीत आहेत.अनुदान न मिळाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बियाणे उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी दिला. अनुदानासंदर्भात केवळ आश्वासन मिळाले असून, ठोस तोडगा न निघाल्याने चर्चेची ही प्राथमिक बैठक फिस्कटली.

वाशिम : सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, ३० मार्च रोजी कृषी विभागाने पुन्हा एकदा शेतकºयांची बैठक बोलाविली आहे.

शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठी अनुदान दिले जाते. गत सात वर्षांपासून बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठीचे अनुदान शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळांना अनुदान देण्यात येते. वाशिम जिल्ह्यात सन २०१० पासून सुमारे १८ शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळाने हजारो क्विंटल बियाणे उत्पादन करीत आहेत. आतापर्यंत बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळालेले आहे. पूर्वानुभव लक्षात घेता सन २०१६-१७ मध्ये ९९६.७० क्विंटल हरभरा बियाणे उत्पादन केले. त्यापोटी बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळणे अपेक्षीत आहे, असे शेतकरी उत्पादक गट व कंपन्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे निवेदन देत अनुदान देण्याची मागणी केली. यावर कोणताच सकारात्मक निर्णय न झाल्याने २२ मार्च रोजी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्र देत ३० मार्चपर्यंत अनुदान न मिळाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बियाणे उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी दिला. याची दखल घेत शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश कृषी, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव डॉ. किरण पाटील यांनी २६ मार्च रोजी वाशिम, बुलडाणा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले होते. या निर्देश पत्रात मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देण्यात आला. त्या अनुषंगाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बुलडाणा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, वाशिम येथील प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, ‘आत्मा’ कार्यालयाच्या प्रभारी प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपसंचालक आर.एस. कदम, तंत्र सहायक टी.पी. आरू आदींनी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी बियाणे उत्पादन करताना आलेल्या अडचणी व बँक, पतसंस्थेंकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळाले नाही तर कर्जाची परतफेड कशी करावी, अशी आपबिती शेतकऱ्यांनी कथन केली. या अनुदानासंदर्भात केवळ आश्वासन मिळाले असून, ठोस तोडगा न निघाल्याने चर्चेची ही प्राथमिक बैठक फिस्कटली. दरम्यान, ३० मार्च रोजी पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलाविण्यात आले आहे. या चर्चेत बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनी बाळखेड, बालाजी शेतकरी उत्पादक गट किनखेडा, संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, बाळनाथ शेतकरी उत्पादक गट, हरिओम शेतकरी उत्पादक कंपनी, देवळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी माऊली शेतकरी उत्पादक कंपनी, परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनी यासह बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ३० मार्च रोजीही ठोस तोडगा न निघाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशाऱ्यावर ठाम असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी