शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी... शेतात साचले पाणीच पाणी; कशी करावी सोयाबीन सोंगणी?

By सुनील काकडे | Updated: October 7, 2022 14:25 IST

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला : परिपक्व सोयाबीनला कोंब फुटण्याची भिती

वाशिम : जून महिन्याच्या प्रारंभी पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगून पोत्यांमध्ये सुरक्षितरित्या ‘पॅक’ झाले. मात्र, उशिराने पेरणी झालेले सोयाबीन परिपक्व अवस्थेत शेतात उभे असून सोंगणीच्या ‘स्टेज’ला आले आहे. असे असताना बुधवार, ५ ऑक्टोबरला जोरदार पाऊस झाला. गुरूवार आणि शुक्रवारीही ढगाळी वातावरण कायम राहून पाऊस सुरूच होता. यामुळे शेतात पाणीच पाणी साचून आहे. अशा स्थितीत सोयाबीनची सोंगणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

जिल्ह्यात चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा खरीपातील पिकांची पेरणी झालेली आहे. विशेषत: तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापलेले आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पोषक वातावरण आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ अपेक्षेनुरूप झाली. विशेषत: या पिकांवर यंदा किडरोगांचा अधिक प्रादुर्भाव न झाल्याने विक्रमी उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती.दरम्यान, तीन ते चार दिवसांत सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू होणार होती; मात्र ५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी साचून कापूस आणि सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणच्या शेतात गुडघाभर पाणी साचून असल्याने सोयाबीनची काढणी नेमकी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तथापि, यापुढेही काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. कृषी विभागाने तातडीची पाऊले उचलत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना शासनस्तरावरून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

चिखलात ना ट्रॅक्टर जात, ना मजूर; बळीराजा परिस्थितीपुढे ‘मजबूर’

शेतात सोयाबीनची झाडे वाळून कणकण झाली. प्रत्येक झाडाला शेंगा लदबदल्या आहेत. अर्थात काढणी करायची आणि सुड्या रचून लगेच ‘थ्रेशर’व्दारे दाणे काढून ते पोत्यात भरण्याची वेळ आली होती. अशात निसर्गाने अचानक चक्र फिरविले आणि काही तासांतच होत्याचे नव्हते झाले. आता चिखल आणि पाणी साचलेल्या शेतांमध्ये ना ट्रॅक्टर जात, ना मजूर. यामुळे सोयाबीनच्या रुपाने ‘कॅश’ समोर दिसतेय; पण ती उचलता येत नाही आणि अधिक विलंब झाला तर तीच ‘कॅश’ मातीमोल होणार आहे. या व्दिधा संकटात अडकलेला बळीराजा पुन्हा एकवेळ खऱ्याअर्थाने परिस्थितीपुढे ‘मजबूर’ झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी