शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अतिवृष्टी... शेतात साचले पाणीच पाणी; कशी करावी सोयाबीन सोंगणी?

By सुनील काकडे | Updated: October 7, 2022 14:25 IST

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला : परिपक्व सोयाबीनला कोंब फुटण्याची भिती

वाशिम : जून महिन्याच्या प्रारंभी पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगून पोत्यांमध्ये सुरक्षितरित्या ‘पॅक’ झाले. मात्र, उशिराने पेरणी झालेले सोयाबीन परिपक्व अवस्थेत शेतात उभे असून सोंगणीच्या ‘स्टेज’ला आले आहे. असे असताना बुधवार, ५ ऑक्टोबरला जोरदार पाऊस झाला. गुरूवार आणि शुक्रवारीही ढगाळी वातावरण कायम राहून पाऊस सुरूच होता. यामुळे शेतात पाणीच पाणी साचून आहे. अशा स्थितीत सोयाबीनची सोंगणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

जिल्ह्यात चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा खरीपातील पिकांची पेरणी झालेली आहे. विशेषत: तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापलेले आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पोषक वातावरण आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ अपेक्षेनुरूप झाली. विशेषत: या पिकांवर यंदा किडरोगांचा अधिक प्रादुर्भाव न झाल्याने विक्रमी उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती.दरम्यान, तीन ते चार दिवसांत सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू होणार होती; मात्र ५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी साचून कापूस आणि सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणच्या शेतात गुडघाभर पाणी साचून असल्याने सोयाबीनची काढणी नेमकी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तथापि, यापुढेही काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. कृषी विभागाने तातडीची पाऊले उचलत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना शासनस्तरावरून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

चिखलात ना ट्रॅक्टर जात, ना मजूर; बळीराजा परिस्थितीपुढे ‘मजबूर’

शेतात सोयाबीनची झाडे वाळून कणकण झाली. प्रत्येक झाडाला शेंगा लदबदल्या आहेत. अर्थात काढणी करायची आणि सुड्या रचून लगेच ‘थ्रेशर’व्दारे दाणे काढून ते पोत्यात भरण्याची वेळ आली होती. अशात निसर्गाने अचानक चक्र फिरविले आणि काही तासांतच होत्याचे नव्हते झाले. आता चिखल आणि पाणी साचलेल्या शेतांमध्ये ना ट्रॅक्टर जात, ना मजूर. यामुळे सोयाबीनच्या रुपाने ‘कॅश’ समोर दिसतेय; पण ती उचलता येत नाही आणि अधिक विलंब झाला तर तीच ‘कॅश’ मातीमोल होणार आहे. या व्दिधा संकटात अडकलेला बळीराजा पुन्हा एकवेळ खऱ्याअर्थाने परिस्थितीपुढे ‘मजबूर’ झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी