शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

विद्यार्थ्यानेच केला विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, विद्याभारती महाविद्यालयात थरार; अन्य विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण

By सुनील काकडे | Updated: January 7, 2023 19:02 IST

यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशिम : कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात ११ वी सायन्स आणि काॅर्मसच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यादरम्यान एका विद्यार्थ्याने समोरच्या गटातील तीन विद्यार्थ्यांवर अचानक चाकू हल्ला करून जखमी केले. ७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बिलाल याकूब कालूत (१७), नूर अकील पठाण (१७) आणि रेहान रहीम खान हे तीन विद्यार्थी काॅलेजमध्ये असताना निखील अंबादास मेहरे (१२वी सायन्स, रा.शिवाजी नगर) याने किरकोळ वाद घालत नमूद तिन्ही विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला चढविला. यात बिलाल याकूब कालूत याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली; तर अन्य दोघेही जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आधारसिंह सोनोने तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान, या खळबळजनक घटनेला विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनच जबाबदार असल्याचे मत जखमी विद्यार्थ्यांचे पालक याकूब कालूत यांनी व्यक्त केले. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी दिली.पोलिसांकडून आरोपीस अटक -याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निखील मेहरे (१९) याच्यावर भादंविचे कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीSchoolशाळा