शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

विद्यार्थ्यानेच केला विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, विद्याभारती महाविद्यालयात थरार; अन्य विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण

By सुनील काकडे | Updated: January 7, 2023 19:02 IST

यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशिम : कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात ११ वी सायन्स आणि काॅर्मसच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यादरम्यान एका विद्यार्थ्याने समोरच्या गटातील तीन विद्यार्थ्यांवर अचानक चाकू हल्ला करून जखमी केले. ७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बिलाल याकूब कालूत (१७), नूर अकील पठाण (१७) आणि रेहान रहीम खान हे तीन विद्यार्थी काॅलेजमध्ये असताना निखील अंबादास मेहरे (१२वी सायन्स, रा.शिवाजी नगर) याने किरकोळ वाद घालत नमूद तिन्ही विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला चढविला. यात बिलाल याकूब कालूत याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली; तर अन्य दोघेही जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आधारसिंह सोनोने तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान, या खळबळजनक घटनेला विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनच जबाबदार असल्याचे मत जखमी विद्यार्थ्यांचे पालक याकूब कालूत यांनी व्यक्त केले. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी दिली.पोलिसांकडून आरोपीस अटक -याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निखील मेहरे (१९) याच्यावर भादंविचे कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीSchoolशाळा