शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी मंगरुळपीर पालिकेचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:00 IST

वाशिम: सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी आणण्याच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम मंगरुळपीर पालिकेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पापर्यंत आणून त्याद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित केली.योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि यवतमाळ येथील एका नामांकित कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. येत्या दोन दिवसांत या कामाला सुरुवात होऊन महिनाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

वाशिम: सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी आणण्याच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम मंगरुळपीर पालिकेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, यवतमाळ येथील कं पनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेशही झाले असून, येत्या दोन दिवसांत या बहुप्रतिक्षीत योजनेच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाºयांनी दिली आहे.

गतवर्षी मंगरुळपीर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ७४ टक्के पाऊस झाला. परिणामी मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्प भरू शकला नाही. ऐन हिवाळ्यातच या प्रकल्पातील जीवंत साठा संपला आणि मृतसाठ्यातून शहराला दोन महिन्यांपासून दर १५ दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आता या प्रकल्पातील मृतसाठाही संपत आल्याने पुढे या प्रकल्पातून पाणी पुरवठा होण्याची शक्यता संपली आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असल्याने मंगरुळपीर पालिकेच्यावतीने मालेगाव तालुक्यात येणाºया आणि मंगरुळपीर तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पापर्यंत आणून त्याद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित केली. तब्बल ४ कोटीहून अधिक खर्च असलेल्या या योजनेला शासनाची सशर्त मंजुरी मिळाली आहे. आता या मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने या योजनेचे काम युद्ध पातळीवर होणे गरजेचे आहे. त्यानुसार या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि यवतमाळ येथील एका नामांकित कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. या योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेशही जारी झाले असून, ९ एप्रिलपासून हे काम सुरू होणार होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते सुरू झाले नाही. आता येत्या दोन दिवसांत या कामाला सुरुवात होऊन महिनाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतरच त्याचा शहराला किती फायदा होतो, ते स्पष्ट होऊ शकणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरWaterपाणी