शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गोड बोला, गुड बोला : गोड बोलण्यासाठी जीभ नावाचे इंद्रिय कह्यात हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गोड बोलून समोरच्याला जणू हरभºयाच्या झाडावर बसविले की झाले. त्यासाठी मात्र जीभ नावाचे आपले ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गोड बोलून समोरच्याला जणू हरभºयाच्या झाडावर बसविले की झाले. त्यासाठी मात्र जीभ नावाचे आपले इंद्रिय आपल्या कह्यात पाहिजे. अर्थात हे सगळ्यांनाच जमते असे नाही; पण ज्यांना जमते ते सर्वसुखी म्हणता येतील. त्याचाही अभ्यासच हवा. त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोत्रादि इंद्रिये आवरिती/ परि रसने नियमु न करिती/ ते सहस्रधा कवळिजती/ विषयीं इहीं//‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ असे शास्रवचन आहे. स्थिरमती, शुद्धमती, विक्षिप्तमती, अल्पमती, मंदमती असे मतीनुसार माणसांचे प्रकार पडतात. कोण कशा मतीचा आहे, हे ओळखणे फारसे अवघड नसते. समोरचा माणूस ओळखीचा नसेल आणि तो एक शब्दही बोलला नाही तरी त्याची मती कशाप्रकारची असू शकते हे मुद्राभ्यासाने काही प्रमाणात ओळखता येऊ शकते. तुमच्या विचारांची बैठक कशी आहे, हे वाचा स्पष्ट करते. त्यामुळे शहाणी माणसे मोजकं बोलतात. ‘बोलु ऐसे बोले, तेणे विठ्ठल विठ्ठल डोले’ ही बोलण्यातील ताकद अंगी असणारी माणसे फार विरळ असतात.सामान्य आणि असामान्य अशी माणसांची वर्गवारी विचारात घेतली तर असामान्यांसाठी ‘गोड बोला’ हा संदेश असणारच नाही. कारण त्यांना तसे सांगण्याची गरज नसते. तेथे ‘झरा मुळचाची खरा’ असतो. प्रश्न असतो सामान्य जनांचा. यातली एक जमात धूर्त, बेरकी, लबाड, स्वार्थी, कपटी, संधीसाधू, दीर्घद्वेषी, संकुचित प्रवृत्तीची, इतरांना फसवण्यात धन्यता मानणारी इत्यादि स्वभाव वैशिष्टे असणारी असते. त्यांना शब्दाची किंमत काय कळणार? अशी माणसे समोरच्याला कितीही गोड बोलली तर त्याला ते पटणारे नसते. त्यामुळे इतरेजन त्यांच्या गोड बोलण्याला फसत नाहीत. तुकाराम महाराजांनी ‘बोल बोलता सोपे वाटे, करणी करता टीर फाटे’ असे सडेतोडपणे सांगितले आहे.  ‘गोड बोला’ असे म्हणणे सोपे; पण ‘गोड बोलणे’, हे नेमके कुठून यायला हवे. जेथून ते येणे अपेक्षित आहे, तेथून ते खरेच येते का, हा खरा प्रश्न आहे. त्याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमLokmat Eventलोकमत इव्हेंट