शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:37 IST

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांची ...

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. वनमंत्री संजय राठोड म्हणाले की, वन्यजीव शेती अथवा नागरी वस्तीमध्ये आल्याने मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष होतो. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी वन क्षेत्रात विविध उपाययोजना कराव्यात. तसेच मृदसंधारणासोबतच जमिनीतील पाणी पातळी वाढावी, यासाठी वन क्षेत्रामध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वन विभागाने नियोजन करून आगामी काळात जलसंधारणाच्या कामाचे प्रमाण वाढवावे. त्याचबरोबर वन विभागामार्फत कुरण विकास कार्यक्रमसुद्धा राबविण्यात येणार असून, त्याचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्यस्थिती, लसीकरण मोहीम, कायदा व सुव्यवस्था आदी विषयांचाही ना. राठोड यांनी यावेळी आढावा घेतला.

सोहळ अभयारण्य परिसरातील भूसंपादनाचा विषय मार्गी लावणार

कारंजा तालुक्यातील सोहळ अभयारण्य क्षेत्रालगत काही शेतकऱ्यांची जमीन असून या जमिनीच्या आजूबाजूने अभयारण्य आहे. ही खासगी जमीन संपादित करून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यानुसार सदर जमिनीचे भूसंपादन करून घेण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. मंत्रालयस्तरावर सदर प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची कार्यवाही गतीने केली जाईल, असेही राठोड यावेळी म्हणाले.