शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:15 IST

वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुर्वीपेक्षा सद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार वाढलेला आहे. त्यामुळे महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाने सहा जागांवर दावा केला आहे. एका जागेवर अजिबात समाधान मानले जाणार नसून महाआघाडीने उपकाराची भाषा बोलून आम्हाला गृहित धरू नये. याऊपरही वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या जनविरोधी धोरणांमुळे रोष ओढवून घेतलेल्या विद्यमान भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी एकत्रित येवून निवडणूक लढावी, अशी जनतेचीच अपेक्षा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने या जनमताचा आदर राखून जमिनीवरच राहावे, असे तुपकर म्हणाले. सत्तापरिवर्तनात शेतकºयांची भुमिका सर्वात मोठी असून पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला सोडण्याची उपकारित भाषा महाआघाडीने करू नये. ‘स्वाभिमानी’ने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. तो शेवटपर्यंत कायम राहणार असून त्यात कुठलाच बदल आम्हाला मान्य नाही. तसेही शेतकºयांच्या प्रश्नांवर अहोरात्र झटणाºया राजू शेट्टी यांना सोबत घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणे सोपे नसल्याने महाआघाडीने आम्हाला गृहित धरून केवळ एक जागा दिल्यास तिसरी आघाडी उघडून ‘स्वाभिमानी’ स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असेही रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणRavikant Tupkarरविकांत तुपकर