शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:15 IST

वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुर्वीपेक्षा सद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार वाढलेला आहे. त्यामुळे महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाने सहा जागांवर दावा केला आहे. एका जागेवर अजिबात समाधान मानले जाणार नसून महाआघाडीने उपकाराची भाषा बोलून आम्हाला गृहित धरू नये. याऊपरही वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या जनविरोधी धोरणांमुळे रोष ओढवून घेतलेल्या विद्यमान भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी एकत्रित येवून निवडणूक लढावी, अशी जनतेचीच अपेक्षा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने या जनमताचा आदर राखून जमिनीवरच राहावे, असे तुपकर म्हणाले. सत्तापरिवर्तनात शेतकºयांची भुमिका सर्वात मोठी असून पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला सोडण्याची उपकारित भाषा महाआघाडीने करू नये. ‘स्वाभिमानी’ने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. तो शेवटपर्यंत कायम राहणार असून त्यात कुठलाच बदल आम्हाला मान्य नाही. तसेही शेतकºयांच्या प्रश्नांवर अहोरात्र झटणाºया राजू शेट्टी यांना सोबत घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणे सोपे नसल्याने महाआघाडीने आम्हाला गृहित धरून केवळ एक जागा दिल्यास तिसरी आघाडी उघडून ‘स्वाभिमानी’ स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असेही रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणRavikant Tupkarरविकांत तुपकर