शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

'...तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:15 IST

वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुर्वीपेक्षा सद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार वाढलेला आहे. त्यामुळे महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाने सहा जागांवर दावा केला आहे. एका जागेवर अजिबात समाधान मानले जाणार नसून महाआघाडीने उपकाराची भाषा बोलून आम्हाला गृहित धरू नये. याऊपरही वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, की गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या जनविरोधी धोरणांमुळे रोष ओढवून घेतलेल्या विद्यमान भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वच घटक पक्षांनी एकत्रित येवून निवडणूक लढावी, अशी जनतेचीच अपेक्षा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने या जनमताचा आदर राखून जमिनीवरच राहावे, असे तुपकर म्हणाले. सत्तापरिवर्तनात शेतकºयांची भुमिका सर्वात मोठी असून पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान खासदार राजू शेट्टी यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला सोडण्याची उपकारित भाषा महाआघाडीने करू नये. ‘स्वाभिमानी’ने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. तो शेवटपर्यंत कायम राहणार असून त्यात कुठलाच बदल आम्हाला मान्य नाही. तसेही शेतकºयांच्या प्रश्नांवर अहोरात्र झटणाºया राजू शेट्टी यांना सोबत घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणे सोपे नसल्याने महाआघाडीने आम्हाला गृहित धरून केवळ एक जागा दिल्यास तिसरी आघाडी उघडून ‘स्वाभिमानी’ स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असेही रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणRavikant Tupkarरविकांत तुपकर