शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कारंजा तालुक्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 17:30 IST

कारंजा तालुक्यात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क उंबर्डा बाजार (वाशिम): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून श्रीकृष्ण रंगराव पुंड (३६) या युवा शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कारंजा लाड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाºया ग्राम दुघोरा येथे शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कारंजा तालुक्यातील दुघोरा येथील युवा शेतकरी श्रीकृष्ण रंगराव पुंड यांचे कडे ३० एकर शेती असून, या शेतीवर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज काढले आहे. गेल्या आठवड्यात सततच्या पावसामुळे त्यांनी सोंगून ठेवलेल्या सोयाबीनची सुडी ओली झाली. त्यात १७० क्विंटल सोयाबीन सडल्याने त्यांचे अंदाजे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले . त्यातच त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीवर उपचारासाठी एक ते दीड लाख रुपये खर्च झाला. दुखापतीचा खर्च, तसेच पावसामुळे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. मृतक श्रीकृष्ण रंगराव पुंड यांचे मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी वडील, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास उंबर्डा बाजार पोलीस चौकीचे जमादार शेषराव जाधव व पो.कॉ. पवन तायडे करीत आहेत.
टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या