शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून अहवाल सादर करा! वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा नगर परिषदांना ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:57 IST

वाशिम: जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

ठळक मुद्देव्यापारी संकुलांचे नियमित अग्निसुरक्षा व्यवस्था परिक्षण (फायर आॅडिट) व्हायला हवे. व्यावसायिकांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या ५ वर्षांपासून एकाही व्यापारी संकुलाचे ‘फायर आॅडिट’ झाले नाही. याप्रकरणी ‘लोकमत’ने २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा उजेडात आणला होता.

वाशिम: सदोदित ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या जिल्ह्यातील व्यापारी संकुलांचे नियमित अग्निसुरक्षा व्यवस्था परिक्षण (फायर आॅडिट) व्हायला हवे. मात्र, व्यावसायिकांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या ५ वर्षांपासून एकाही व्यापारी संकुलाचे ‘फायर आॅडिट’ झाले नाही. दरम्यान, या विषयावर ‘लोकमत’ने व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, या मथळ्याखाली २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. २१ जून २०१२ रोजी मुंबई मंत्रालयाच्या मुख्य इमारतीस लागलेल्या भीषण आगीची शासनाने गंभीर नोंद घेवून २२ जून २०१२ रोजी महत्वपूर्ण अध्यादेश पारित करत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या स्वमालकीच्या सार्वजनिक इमारती, कार्यालये तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, २०१२ मध्ये शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी असणाºया इमारतींच्या अग्निसुरक्षा व्यवस्था परीक्षणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, तेव्हापासून या गंभीर बाबीकडे कुणीही लक्ष पुरविलेले नाही. दरम्यान, अचानक आग लागल्यास त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेले अग्निरोधक यंत्र बहुतांश प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुलांमध्ये लावण्यात आलेले नाहीत. विशेष गंभीर बाब म्हणजे नगर परिषदांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वर्षातून दोनवेळा ‘फायर आॅडिट’ करण्याचे बंधन असताना प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. याप्रकरणी ‘लोकमत’ने २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा उजेडात आणला होता. त्याची दखल घेवून जिल्हाधिकाºयांनी मंगळवार, ८ जानेवारीला जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना पत्र पाठवून येत्या दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून तसा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयfireआग