शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून अहवाल सादर करा! वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा नगर परिषदांना ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:57 IST

वाशिम: जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

ठळक मुद्देव्यापारी संकुलांचे नियमित अग्निसुरक्षा व्यवस्था परिक्षण (फायर आॅडिट) व्हायला हवे. व्यावसायिकांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या ५ वर्षांपासून एकाही व्यापारी संकुलाचे ‘फायर आॅडिट’ झाले नाही. याप्रकरणी ‘लोकमत’ने २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा उजेडात आणला होता.

वाशिम: सदोदित ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या जिल्ह्यातील व्यापारी संकुलांचे नियमित अग्निसुरक्षा व्यवस्था परिक्षण (फायर आॅडिट) व्हायला हवे. मात्र, व्यावसायिकांची उदासिनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या ५ वर्षांपासून एकाही व्यापारी संकुलाचे ‘फायर आॅडिट’ झाले नाही. दरम्यान, या विषयावर ‘लोकमत’ने व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, या मथळ्याखाली २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. २१ जून २०१२ रोजी मुंबई मंत्रालयाच्या मुख्य इमारतीस लागलेल्या भीषण आगीची शासनाने गंभीर नोंद घेवून २२ जून २०१२ रोजी महत्वपूर्ण अध्यादेश पारित करत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या स्वमालकीच्या सार्वजनिक इमारती, कार्यालये तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, २०१२ मध्ये शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी असणाºया इमारतींच्या अग्निसुरक्षा व्यवस्था परीक्षणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, तेव्हापासून या गंभीर बाबीकडे कुणीही लक्ष पुरविलेले नाही. दरम्यान, अचानक आग लागल्यास त्यापासून बचावासाठी आवश्यक असलेले अग्निरोधक यंत्र बहुतांश प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुलांमध्ये लावण्यात आलेले नाहीत. विशेष गंभीर बाब म्हणजे नगर परिषदांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वर्षातून दोनवेळा ‘फायर आॅडिट’ करण्याचे बंधन असताना प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. याप्रकरणी ‘लोकमत’ने २ जानेवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा उजेडात आणला होता. त्याची दखल घेवून जिल्हाधिकाºयांनी मंगळवार, ८ जानेवारीला जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना पत्र पाठवून येत्या दोन महिन्यात ‘फायर आॅडिट’ करून तसा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयfireआग