शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

विहिर पुनर्भरणाने सुभाष चौक परिसर जलसमृध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 15:33 IST

मुख्याध्यापक सुरेश खरावन यांनी परिसरातील नागरिकांना सोबत घेवून विहिर पूनर्भरण केले अन या परिसरातील पाणी टंचाई दूर झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  विहिर, कुपनलिका व नगरपालिकेचे नळ असतानाही पाण्याचे दुर्भिक्ष्य. दरवर्षी उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खरावन यांनी परिसरातील नागरिकांना सोबत घेवून विहिर पूनर्भरण केले अन या परिसरातील पाणी टंचाई दूर झाली. आजच्या घडीला हा भाग जलसमृध्द झाला आहे.जल है तो कल है , पाणी हेच जिवन  या अनुषंगाने काळाची गरज ओळखून काटीवेश, सुभाषचौक,भटगल्ली वाशीम येथील डॉ.प्रदीप फाटक यांचे घरासमोरील विहीरीत  घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी फिल्टर करून पाईपद्वारे विहीरीत सोडण्याच्या उपक्रमाचे उदघाटन,सालाबादाप्रमाणे याहीवर्षी  १८ जुलै २०१९ गुरूवार रोजी  करण्यात आले. रा.ल.कन्या शाळा वाशीमचे सचिव मा.डॉ.प्रदीप फाटक यांचे शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जल है तो कल है..हे वाक्य बालमनावर खोलवर रुजवायला पाहीजे.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सदर उपक्रम रा.ल. कन्या शाळा वाशीमचे उपमुख्याध्यापक सुरेश खरावन यांच्या पुढाकाराने सन २००९ पासून सुरु आहे. तीन घराच्या छतावरील पावसाचे पाणि गाळून विहीरीत सोडले जाते. याचा फायदा वेटाळातील सर्वच नागरिकांना होतो. सदर उपक्रमाची बांधनी करण्यासाठी शाम खुळे,अक्षय गारी, क्रुष्णा खुळे,स्वराज सोसे, योगेश कोष्टी , शंकर खुळे ,अमन तोळंबे यांनी सहकार्य केले.  यावेळी,प्रत्येक विहीरीवर हा उपक्रम राबवायला पाहीजे ,अशी अपेक्षा संकल्पनाकार सुरेश खरावन यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा सर्वांनाच होत असल्याची भावना उपस्थीत नागरिकांनी व्यक्त केली. सदर उपक्रमास डॉ.प्रदीप फाटक,मनोहर आलमवार,पुरूषोत्तम दुरतकर,विश्वनाथ पाटील नाईकवाडे,शिवआप्पा आलमवार ,गोपाल ठाकूर,सुनिल तोळंबे,सुरेश इथापे, सागर खरावन ,गणेश ठाकूर ,पंकज खुळे इत्यादींचे मार्ग दर्शन लाभत असते. दुष्काळीपरिसर बनला पाणीदार२००९ मध्ये वाशिम शहरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. यावेळी सुभाष चौकातील अनेक नागरिक यावर चर्चा करायचे. राणी लक्ष्मीबाई शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खरावण यांनी त्यावेही विहिर पूनर्भरणाचा विषय सर्वांसमोर मांडला.  काहींनी सुरुवातीला विरोध केला तर काही जण सोबत होते. असे असतांना सुरवातीला विहिरीतील उपसा केला व नंतर ज्यांची इच्छा होती त्यांच्या छतावरील पाणी विहिरीत सोडले. छताचे पाणी फिल्टर व्हावे असे नियोजन केले. २०१० मध्ये शहरात पाणी टंचाई जाणवली परंतु तेथे मात्र मुबलक पाणी होते. तेव्हापासून पावसाळयात हा उपक्रम अविरत सुरु आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी