शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

विहिर पुनर्भरणाने सुभाष चौक परिसर जलसमृध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 15:33 IST

मुख्याध्यापक सुरेश खरावन यांनी परिसरातील नागरिकांना सोबत घेवून विहिर पूनर्भरण केले अन या परिसरातील पाणी टंचाई दूर झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  विहिर, कुपनलिका व नगरपालिकेचे नळ असतानाही पाण्याचे दुर्भिक्ष्य. दरवर्षी उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खरावन यांनी परिसरातील नागरिकांना सोबत घेवून विहिर पूनर्भरण केले अन या परिसरातील पाणी टंचाई दूर झाली. आजच्या घडीला हा भाग जलसमृध्द झाला आहे.जल है तो कल है , पाणी हेच जिवन  या अनुषंगाने काळाची गरज ओळखून काटीवेश, सुभाषचौक,भटगल्ली वाशीम येथील डॉ.प्रदीप फाटक यांचे घरासमोरील विहीरीत  घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी फिल्टर करून पाईपद्वारे विहीरीत सोडण्याच्या उपक्रमाचे उदघाटन,सालाबादाप्रमाणे याहीवर्षी  १८ जुलै २०१९ गुरूवार रोजी  करण्यात आले. रा.ल.कन्या शाळा वाशीमचे सचिव मा.डॉ.प्रदीप फाटक यांचे शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जल है तो कल है..हे वाक्य बालमनावर खोलवर रुजवायला पाहीजे.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सदर उपक्रम रा.ल. कन्या शाळा वाशीमचे उपमुख्याध्यापक सुरेश खरावन यांच्या पुढाकाराने सन २००९ पासून सुरु आहे. तीन घराच्या छतावरील पावसाचे पाणि गाळून विहीरीत सोडले जाते. याचा फायदा वेटाळातील सर्वच नागरिकांना होतो. सदर उपक्रमाची बांधनी करण्यासाठी शाम खुळे,अक्षय गारी, क्रुष्णा खुळे,स्वराज सोसे, योगेश कोष्टी , शंकर खुळे ,अमन तोळंबे यांनी सहकार्य केले.  यावेळी,प्रत्येक विहीरीवर हा उपक्रम राबवायला पाहीजे ,अशी अपेक्षा संकल्पनाकार सुरेश खरावन यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा सर्वांनाच होत असल्याची भावना उपस्थीत नागरिकांनी व्यक्त केली. सदर उपक्रमास डॉ.प्रदीप फाटक,मनोहर आलमवार,पुरूषोत्तम दुरतकर,विश्वनाथ पाटील नाईकवाडे,शिवआप्पा आलमवार ,गोपाल ठाकूर,सुनिल तोळंबे,सुरेश इथापे, सागर खरावन ,गणेश ठाकूर ,पंकज खुळे इत्यादींचे मार्ग दर्शन लाभत असते. दुष्काळीपरिसर बनला पाणीदार२००९ मध्ये वाशिम शहरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. यावेळी सुभाष चौकातील अनेक नागरिक यावर चर्चा करायचे. राणी लक्ष्मीबाई शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खरावण यांनी त्यावेही विहिर पूनर्भरणाचा विषय सर्वांसमोर मांडला.  काहींनी सुरुवातीला विरोध केला तर काही जण सोबत होते. असे असतांना सुरवातीला विहिरीतील उपसा केला व नंतर ज्यांची इच्छा होती त्यांच्या छतावरील पाणी विहिरीत सोडले. छताचे पाणी फिल्टर व्हावे असे नियोजन केले. २०१० मध्ये शहरात पाणी टंचाई जाणवली परंतु तेथे मात्र मुबलक पाणी होते. तेव्हापासून पावसाळयात हा उपक्रम अविरत सुरु आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी