शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी राहिले दोन दिवस उपाशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 19:11 IST

मंगरुळपीर : प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील अनुसूचित जाती, जमाती मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दोन दिवस उपाशी राहावे लागल्याचा प्रकार घडला. वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर समाजिक न्याय विभाग वाशिमचे अधिकारी मुसळे आणि गृहपाल सोनटक्के यांनी वसतीगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देआंदोलानंतरच समाजिक न्याय विभागाकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील अनुसूचित जाती, जमाती मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दोन दिवस उपाशी राहावे लागल्याचा प्रकार घडला. वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर समाजिक न्याय विभाग वाशिमचे अधिकारी मुसळे आणि गृहपाल सोनटक्के यांनी वसतीगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मंगरुळपीर शहरालगतच अंबापूर येथे समाज कल्याण विभागांतर्गत अनुसुचित जाती, जमातीच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्यात आले आहे. या वसतीगृहात ग्रामीण विभागातील जवळपास दोनशे विद्यार्थी आहेत. या वसतीगृृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या आहारासह शैक्षणिक साहित्य आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी प्राप्त होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणे आवश्यक आहे; परंतु परिस्थिती अगदी त्या विरुद्ध असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवणसुद्धा अनियमितपणे दिले जात आहे. त्याशिवाय दोन वर्षांपासून शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरीचा खर्चही मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी मंगरुळपीर-वाशिमचे आमदार लखन मलिक आणि नगरसेवक अनिल गावंडे यांनी या वसतीगृहाला भेट दिली असता त्यांच्या लक्षातही हा प्रकार आला होता. त्यांनी याबाबत अधिकाºयांना सूचित करून दखल घेण्यास सांगितले होते. आता अवघे १५ दिवस उलटत नाही तोच येथील विद्यार्थ्यांना मागील दोन दिवसांपासून उपाशीपोटी राहावे लागले. या प्रकारामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर सामाजिक न्याय विभाग वाशिमचे अधिकारी मुसळे आणि गृहपाल सोनटक्के यांनी शनिवारी या वसतीगृहाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली. अंबापूरच्या वसतीगृहाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता अमरावती येथील समाज कल्याण आयुक्तांनीच दखल घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, दोन दिवस उपाशी राहिलेल्या विद्यार्थ्यांना भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी खिचडीचे वाटप केले.  

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन