शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

रिसोड : पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असून, त्याचेही जिल्हास्तरावर रेकाॅर्ड उपलब्ध नाही. ...

रिसोड : पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असून, त्याचेही जिल्हास्तरावर रेकाॅर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू असून ती तत्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर यांनी दिला आहे.

यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांच्या खात्यातून पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आली. त्यात केंद्र व राज्य शासनाने आपापला हिस्सा मिळवून एकत्रित १०६ कोटी ३८ लाख ७७ हजार ३९ रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आली. त्यापैकी केवळ १७ कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दिल्याचे विमा कंपनी व कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरित केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेचे कुठलेच रेकॉर्ड जिल्ह्यातील एकाही अधिकाऱ्याकडे अथवा कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर सुरू असलेली ही निव्वळ लूट असून ती तत्काळ थांबवावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा भुतेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठविल्याचे त्यांनी सांगितले.