शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

रिसोड : पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असून, त्याचेही जिल्हास्तरावर रेकाॅर्ड उपलब्ध नाही. ...

रिसोड : पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असून, त्याचेही जिल्हास्तरावर रेकाॅर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू असून ती तत्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर यांनी दिला आहे.

यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांच्या खात्यातून पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आली. त्यात केंद्र व राज्य शासनाने आपापला हिस्सा मिळवून एकत्रित १०६ कोटी ३८ लाख ७७ हजार ३९ रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आली. त्यापैकी केवळ १७ कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दिल्याचे विमा कंपनी व कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरित केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेचे कुठलेच रेकॉर्ड जिल्ह्यातील एकाही अधिकाऱ्याकडे अथवा कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर सुरू असलेली ही निव्वळ लूट असून ती तत्काळ थांबवावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा भुतेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठविल्याचे त्यांनी सांगितले.