शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

वाशिम जिल्ह्यात सोयाबिन बियाण्याचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:54 IST

‘लॉकडाऊन’चा परिणाम : १७ मे नंतरच सुटणार तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना सोयाबिन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशातील ज्या जिल्ह्यांमधून बियाणे उपलब्ध होते, ते जिल्हेच ‘लॉकडाऊन’मुळे बंद असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून १७ मे नंतरच हा तिढा सुटू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाऊन लागू असून त्याचा शेती क्षेत्राला बराच मोठा फटका बसला आहे. तथापि, अत्यावश्यक सेवांसह कृषीविषयक कामांना संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता देण्यात आली असून रेल्वेव्दारे माल वाहतूक देखील केली जात आहे. असे असले तरी मध्यप्रदेशातील इंदौर, उज्जैन, खंडवा या ज्या जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात सोयाबिनसह इतर बियाणे येते, ते जिल्हेच सद्या ‘लॉकडाऊन’च्या कचाट्यात अडकले असून पुरेसे मजूर, कामगारांअभावी बियाणे निर्मिती व वाहतूक प्रभावित झाली आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबिनचे बियाणे येणे बंद झाले आहे. येत्या १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार असून किमान तोपर्यंत तरी हा तिढा सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांनी घरच्याच बियाण्याची यंदा पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. त्यानुषंगाने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन जनजागृती केली जात असल्याचे दिसून येत आहे. खताचाही जाणवणार तुटवडा!जिल्ह्यात आतापर्यंत दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के खतविक्री झालेली आहे; मात्र यापुढे खताचा देखील तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी ठराविक एकाच कंपनीच्या खताचा आग्रह न धरता विद्यापिठाच्या शिफारशीनुसार इतर खतांचाही वापर शेतीसाठी करावा. ऐन खरीप हंगामात खत खरेदी न करता आताच हळूहळू का होईना कृषी निविष्ठांची जमवाजमव करून ठेवावी, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी