शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाशिम जिल्ह्यात सोयाबिन बियाण्याचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:54 IST

‘लॉकडाऊन’चा परिणाम : १७ मे नंतरच सुटणार तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना सोयाबिन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशातील ज्या जिल्ह्यांमधून बियाणे उपलब्ध होते, ते जिल्हेच ‘लॉकडाऊन’मुळे बंद असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून १७ मे नंतरच हा तिढा सुटू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाऊन लागू असून त्याचा शेती क्षेत्राला बराच मोठा फटका बसला आहे. तथापि, अत्यावश्यक सेवांसह कृषीविषयक कामांना संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता देण्यात आली असून रेल्वेव्दारे माल वाहतूक देखील केली जात आहे. असे असले तरी मध्यप्रदेशातील इंदौर, उज्जैन, खंडवा या ज्या जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात सोयाबिनसह इतर बियाणे येते, ते जिल्हेच सद्या ‘लॉकडाऊन’च्या कचाट्यात अडकले असून पुरेसे मजूर, कामगारांअभावी बियाणे निर्मिती व वाहतूक प्रभावित झाली आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबिनचे बियाणे येणे बंद झाले आहे. येत्या १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार असून किमान तोपर्यंत तरी हा तिढा सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांनी घरच्याच बियाण्याची यंदा पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. त्यानुषंगाने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन जनजागृती केली जात असल्याचे दिसून येत आहे. खताचाही जाणवणार तुटवडा!जिल्ह्यात आतापर्यंत दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के खतविक्री झालेली आहे; मात्र यापुढे खताचा देखील तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी ठराविक एकाच कंपनीच्या खताचा आग्रह न धरता विद्यापिठाच्या शिफारशीनुसार इतर खतांचाही वापर शेतीसाठी करावा. ऐन खरीप हंगामात खत खरेदी न करता आताच हळूहळू का होईना कृषी निविष्ठांची जमवाजमव करून ठेवावी, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी