शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:35 AM

गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. 

ठळक मुद्दे बाजारभावात घसरण  शेतकर्‍यांचे बजेट कोलमडतेय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. सन २0१६ चा अपवाद वगळता मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकर्‍यांवर नानाविध संकटे ओढवली होती. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अपेक्षित उत्पादन झाले; मात्र शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली होती. गतवर्षीचे चांगले-वाईट अनुभव पचवित यावर्षीदेखील खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठय़ा आनंदात पेरणी केली. यावर्षी चार लाख नऊ हजार हेक्टरपैकी सव्वा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अशातच परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दाणादाण उडविली. गत आठवड्यात चार ते पाच दिवस परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात सोंगून करून ठेवलेले सोयाबीन मोठय़ा प्रमाणात भिजले. तीन ते चार दिवसात फारसा खंड न दिल्याने शेतकर्‍यांना सोंगून ठेवलेले सोयाबीन वाळवितादेखील आले नाही. त्यामुळे आता भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी फारच खालावल्याचे दिसून येत आहे. सव्वा दोन लाख हेक्टरपैकी जवळपास ७0 ते ८0 हजार हेक्टरवरील सोयाबीनला परतीच्या पावसाने जबर हाणी पोहोचविल्याची भीती कृषी विभागानेदेखील वर्तविली आहे. गत तीन दिवसांपासून परतीचा पाऊस नसल्याने मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. तथापि, भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी घसरल्याने १२00 ते १५00 च्या दरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचा दावा शेतकर्‍यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. बाजार समित्यांमध्ये भिजलेले सोयाबीन कवडीमोल भावाने घेतले जात असल्याने शेतकर्‍यांचे बजेट पुरते कोलमडून जात आहे. ऐन दिवाळीदरम्यान अशी परिस्थिती ओढवल्याने अल्प भूधारक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवले. अगोदरच उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट; त्यातही परतीच्या पावसाने लावलेला ‘डाग’, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे दिसून येते. परतीच्या पावसामुळे सोयाबीन भिजल्याने एक हजार ते १५00 रुपयादरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचे किनखेडा येथील शेतकरी गजानन अवचार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :agricultureशेती