शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पेरलेले बियाणे उगवलेच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:05 IST

इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली.तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी उल्हासित झाला असतानाच त्याच्यावरील संकटाच्या मालिकेलाही सुरुवात झाली आहे. इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.यंदा मान्सून लांबल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. २२ जुनपर्यंतही मान्सूनचा पत्ताच नव्हता. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची स्थिती सारखीच होती. त्यात मानोरा तालुक्याचाही समावेश होता. खरीपासाठी मशागत करून जमीन तयार केली असतानाही पावसाचा मागमुस नसल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर २२ जुनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकºयांनी खरीपाच्या पेरणीला वेगही दिला. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारातील शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली. त्यातील तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जवळपास ८ शेतकºयांना या प्रकाराचा फटका बसला आहे. आता या संदर्भात शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी आणि महाबीजकडे तक्रार करून शेताची पाहणी करण्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.  शेतकºयांकडून जमिनीतील बियाण्यांची पाहणी इंझोरी शिवारातील बहुतांश शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे पेरले आहे. आता ज्या शेतकºयांच्या शेतात सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. ते शेतकरी शेतात पेरणीच्या सºया उकरून बियाण्यांचा शोध घेऊन नेमके काय घडले ते माहिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

  शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार अद्याप आपल्याकडे आलेली नाही. तथापि, इंझोरी शिवारात असा प्रकार घडला असेल, तर प्रत्यक्ष शेतांना भेटी देऊन पाहणी करू आणि वस्तूस्थितीनुसार शेतकºयांना नुकसान भरपाई किंवा मोबदला देण्याचा निर्णय घेऊ.-डॉ. प्रशांत घावडे

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी