शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

पेरलेले बियाणे उगवलेच नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:05 IST

इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली.तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी उल्हासित झाला असतानाच त्याच्यावरील संकटाच्या मालिकेलाही सुरुवात झाली आहे. इंझोरी शिवारात महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.यंदा मान्सून लांबल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. २२ जुनपर्यंतही मान्सूनचा पत्ताच नव्हता. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची स्थिती सारखीच होती. त्यात मानोरा तालुक्याचाही समावेश होता. खरीपासाठी मशागत करून जमीन तयार केली असतानाही पावसाचा मागमुस नसल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर २२ जुनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकºयांनी खरीपाच्या पेरणीला वेगही दिला. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारातील शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. आंतरपिक म्हणून तुरीची पेरणीही केली. त्यातील तुरीचे बियाणे उगवले; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. जवळपास ८ शेतकºयांना या प्रकाराचा फटका बसला आहे. आता या संदर्भात शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी आणि महाबीजकडे तक्रार करून शेताची पाहणी करण्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.  शेतकºयांकडून जमिनीतील बियाण्यांची पाहणी इंझोरी शिवारातील बहुतांश शेतकºयांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे पेरले आहे. आता ज्या शेतकºयांच्या शेतात सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. ते शेतकरी शेतात पेरणीच्या सºया उकरून बियाण्यांचा शोध घेऊन नेमके काय घडले ते माहिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

  शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार अद्याप आपल्याकडे आलेली नाही. तथापि, इंझोरी शिवारात असा प्रकार घडला असेल, तर प्रत्यक्ष शेतांना भेटी देऊन पाहणी करू आणि वस्तूस्थितीनुसार शेतकºयांना नुकसान भरपाई किंवा मोबदला देण्याचा निर्णय घेऊ.-डॉ. प्रशांत घावडे

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी