शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:24 IST

जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत असून, त्याअनुषंगाने सर्वेक्षण केले जात आहे. २२ जूनपर्यंत जवळपास १०० तक्रारी प्राप्त झाल्या. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे लवकर आगमन झाले. १० ते १६ जूनदरम्यान बºयापैकी पाऊस झाल्याने ८० टक्क्यापेक्षा अधिक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. दरम्यान, जेथे जमिनीत चार इंच ओलावा नाही किंवा ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथे शेतकºयांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. ज्या महसूल मंडळात ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथेही अनेक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे. पेरणीनंतर ८, ९ दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. घरगुती बियाणे, उत्पादक कंपन्यांचे बियाणे तसेच महाबिजचेही बियाणे उगवले नसल्याच्या जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहायक आदींचा समावेश असलेल्या चमूच्यावतीने घटनास्थळी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाअंती वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठविला जाणार आहे. शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आतापर्यंत जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार कृषी विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी