शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेले बियाणे उगवलेच नाही; शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:24 IST

जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत असून, त्याअनुषंगाने सर्वेक्षण केले जात आहे. २२ जूनपर्यंत जवळपास १०० तक्रारी प्राप्त झाल्या. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे लवकर आगमन झाले. १० ते १६ जूनदरम्यान बºयापैकी पाऊस झाल्याने ८० टक्क्यापेक्षा अधिक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. दरम्यान, जेथे जमिनीत चार इंच ओलावा नाही किंवा ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथे शेतकºयांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. ज्या महसूल मंडळात ८० मीमी पेक्षा कमी पाऊस झाला तेथेही अनेक शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४ लाख ६ हजार २३४ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २२ जूनपर्यंत ८० टक्के पेरणी उरकली आहे. पेरणीनंतर ८, ९ दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. घरगुती बियाणे, उत्पादक कंपन्यांचे बियाणे तसेच महाबिजचेही बियाणे उगवले नसल्याच्या जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहायक आदींचा समावेश असलेल्या चमूच्यावतीने घटनास्थळी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाअंती वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल पाठविला जाणार आहे. शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आतापर्यंत जवळपास १०० शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार कृषी विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी