शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जनता कर्फ्यू संपताच वाशिमच्या बाजारपेठेत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:15 IST

नागरिकांनी विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर अशी सात दिवस बाजारपेठ बंद ठेवली. २३ सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्ववत होताच, नागरिकांनी विविध वस्तू व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही तर अनेक व्यापाºयांनीदेखील ग्राहकांना दुकानात प्रवेश देताना आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचेही दिसून आले.जिल्ह्यात ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाशिम शहरातही सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आॅगस्टअखेर १७३५ कोरोनाबाधितांची संख्या होती. सप्टेंबर महिन्यात २२ दिवसात यामध्ये १९८९ रुग्णांची भर पडली. उपचारादरम्यान मृत्यूसंख्याही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. आॅगस्टअखेर कोरोनाने ३० जणांचे बळी घेतले. सप्टेंबर महिन्याच्या २२ दिवसात यामध्ये आणखी ३९ जणांची भर पडली. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक वाशिम येथील बाजारपेठेत विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी तसेच विविध कामानिमित्त शहरात येतात. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर होत नसल्याने तसेच गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापारी मंडळ व युवा व्यापारी मंडळाने १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू पाळत बाजारपेठ बंद ठेवली. २३ सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्ववत होताच, सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ वाढली. पाटणी चौकस्थित बाजारपेठेत नागरिकांसह वाहनधारकांची एकच गर्दी झाल्याने दुपारच्या सुमारास पाटणी चौकात काही वेळ वाहतुकही प्रभावित झाली होती. अनेक जणांनी मास्कचा वापर केला नाही तसेच फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले नसल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक