शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला हस्तांतरीत करावे !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 13:20 IST

वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या हद्दीत सोहळ काळविट अभयारण्य आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याच्या क्षेत्रातच अडाण नदीसारखे भव्य असे नैसर्गिक जलस्त्रोतही आहे. सदर अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडे हस्तांतरीत केल्यास वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरेल.

वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.  वन्यजीव संवर्धनासाठी गेल्या सहा वर्षांपासून कार्य करीत असलेले मंगळरुळपीर येथील वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या हद्दीत सोहळ काळविट अभयारण्य आहे. गवताळ प्रदेशात असलेले हे विदर्भातील भव्य असे एकमेव अभयारण्य आहे. वन्यजीवांपैकी धोकादायक नसलेल्या काळविटाच्या संवर्धनासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली असून, याचे व्यवस्थापन अकोला वनविभागाकडे आहे. तथापि, या अभयारण्यात वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक व्यवस्थापनही केले जात नाही आणि त्यासाठी लोकांना प्रेरितही केले जात नाही. विशेष म्हणजे या अभयारण्याच्या क्षेत्रातच अडाण नदीसारखे भव्य असे नैसर्गिक जलस्त्रोतही आहे. त्यामुळे या अभयारण्यात विविध तांत्रिक मुद्यांचा आधार घेऊन चांगल्याप्रकारे वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे आपणास वाटते, ही बाब विचारात घेऊन सदर अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडे हस्तांतरीत केल्यास वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरेल. त्यामुळे आपण या मागणीचा विचार करून  सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे तस्तांतरीत करण्याचा ठाम निर्णय घ्यावा, असेही गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव