शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला हस्तांतरीत करावे !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 13:20 IST

वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या हद्दीत सोहळ काळविट अभयारण्य आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याच्या क्षेत्रातच अडाण नदीसारखे भव्य असे नैसर्गिक जलस्त्रोतही आहे. सदर अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडे हस्तांतरीत केल्यास वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरेल.

वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.  वन्यजीव संवर्धनासाठी गेल्या सहा वर्षांपासून कार्य करीत असलेले मंगळरुळपीर येथील वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या हद्दीत सोहळ काळविट अभयारण्य आहे. गवताळ प्रदेशात असलेले हे विदर्भातील भव्य असे एकमेव अभयारण्य आहे. वन्यजीवांपैकी धोकादायक नसलेल्या काळविटाच्या संवर्धनासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली असून, याचे व्यवस्थापन अकोला वनविभागाकडे आहे. तथापि, या अभयारण्यात वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक व्यवस्थापनही केले जात नाही आणि त्यासाठी लोकांना प्रेरितही केले जात नाही. विशेष म्हणजे या अभयारण्याच्या क्षेत्रातच अडाण नदीसारखे भव्य असे नैसर्गिक जलस्त्रोतही आहे. त्यामुळे या अभयारण्यात विविध तांत्रिक मुद्यांचा आधार घेऊन चांगल्याप्रकारे वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे आपणास वाटते, ही बाब विचारात घेऊन सदर अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडे हस्तांतरीत केल्यास वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरेल. त्यामुळे आपण या मागणीचा विचार करून  सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे तस्तांतरीत करण्याचा ठाम निर्णय घ्यावा, असेही गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव