शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला हस्तांतरीत करावे !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 13:20 IST

वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या हद्दीत सोहळ काळविट अभयारण्य आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याच्या क्षेत्रातच अडाण नदीसारखे भव्य असे नैसर्गिक जलस्त्रोतही आहे. सदर अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडे हस्तांतरीत केल्यास वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरेल.

वाशिम: विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेल्या सोहळ काळविट अभयारण्यात स्थानिक वनविभागाच्यावतीने आवश्यक उपाय योजना करून वन्यजीवांचे सवंर्धन करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सदर अभयारण चांगल्या देखभालीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे.  वन्यजीव संवर्धनासाठी गेल्या सहा वर्षांपासून कार्य करीत असलेले मंगळरुळपीर येथील वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या हद्दीत सोहळ काळविट अभयारण्य आहे. गवताळ प्रदेशात असलेले हे विदर्भातील भव्य असे एकमेव अभयारण्य आहे. वन्यजीवांपैकी धोकादायक नसलेल्या काळविटाच्या संवर्धनासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली असून, याचे व्यवस्थापन अकोला वनविभागाकडे आहे. तथापि, या अभयारण्यात वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक व्यवस्थापनही केले जात नाही आणि त्यासाठी लोकांना प्रेरितही केले जात नाही. विशेष म्हणजे या अभयारण्याच्या क्षेत्रातच अडाण नदीसारखे भव्य असे नैसर्गिक जलस्त्रोतही आहे. त्यामुळे या अभयारण्यात विविध तांत्रिक मुद्यांचा आधार घेऊन चांगल्याप्रकारे वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे आपणास वाटते, ही बाब विचारात घेऊन सदर अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडे हस्तांतरीत केल्यास वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरेल. त्यामुळे आपण या मागणीचा विचार करून  सोहळ अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे तस्तांतरीत करण्याचा ठाम निर्णय घ्यावा, असेही गौरवकुमार इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव