शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठय़ांची स्थिती चिंताजनक; पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:28 IST

यंदा पावसाळा संपत आला तरी सरासरीच्या  तुलनेत निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. परिणामी  जिल्ह्यातील मध्यम आणि लघू मिळून १२६ प्रकल्पांत  जलसंचयच झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४0  हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, जिल्ह्यातील  सर्व प्रकल्पांत मिळून  केवळ १९.७७ टक्के उपयुक्त  जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा जिल्हावासीयांना  हिवाळय़ापासूनच पाणीटंचाईच्या भीषण संकटाचा  सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली  आहे. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील चित्र प्रकल्पांमध्ये केवळ २0 टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा पावसाळा संपत आला तरी सरासरीच्या  तुलनेत निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. परिणामी  जिल्ह्यातील मध्यम आणि लघू मिळून १२६ प्रकल्पांत  जलसंचयच झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४0  हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, जिल्ह्यातील  सर्व प्रकल्पांत मिळून  केवळ १९.७७ टक्के उपयुक्त  जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा जिल्हावासीयांना  हिवाळय़ापासूनच पाणीटंचाईच्या भीषण संकटाचा  सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली  आहे. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७ सप्टेंबरपर्यं त केवळ ६२.१९ टक्के पाऊस झाला. साहजिकच कमी  पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२३ लघू  प्रकल्पांसह बॅरेजेस मिळून एकूण १२६ प्रकल्पांत केवळ  १९.७७ टक्के जलसाठा उरला आहे. मागील वर्षांंची  आकडेवारी लक्षात घेतल्यास यावर्षीची परिस्थिती गेल्या  नऊ वर्षांतील सर्वात भीषण असल्याचे स्पष्ट होत आहे.  यापूर्वी २00८ मध्ये १५ ऑक्टोबर रोजीच्या पाटबंधारे  विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या सर्व प्रकल्पांतील  मिळून एकूण उपयुक्त जलसाठय़ाची टक्केवारी २५.८३  टक्के, तर २00९ मध्ये उपयुक्त जलसाठय़ाची टक्केवारी  केवळ १८.0६ टक्के होती. यंदा सप्टेंबरच्या ७ तारखे पर्यंंतच जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ १९.७७ टक्के उ पयुक्त जलसाठा उरला आहे. आता मोठय़ा प्रमाणात  पाऊस येण्याची शक्यता मावळल्यात जमा असल्याने  जलप्रकल्पांची स्थिती अधिकच गंभीर होणार आहे.  त्यामुळे येत्या दोन महिन्यांत हिवाळय़ाच्या दिवसांतच  जिल्हाभरातील भीषण पाणीटंचाईचा सामना करावा  लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाणी आरक्षण समितीकडून तातडीच्या उपायांची गरजजिल्ह्यातील पाण्याबाबतची स्थिती लक्षात घेऊन  िपण्यासाठी पाणी आरक्षित करण्याच्या दृष्टीने दरवर्षी  ऑक्टोबर महिन्यात जिल्हाधिकारी तथा पाणी आरक्षण  समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या  अध्यक्षतेखाली पाणी आरक्षण समितीची बैठक  आयोजित करण्यात येते. यामध्ये जिल्ह्यातील  पाणीसाठय़ाचे प्रमाण आणि आवश्यकतेचा विचार  करून विविध यंत्रणाच्या मागणीनुसार पाणी आरक्षण  करण्याबाबत निर्णय घेण्यात येतात. आता या बैठकीला  महिनाभराचा कालावधी असल्याने जिल्ह्यातील संभाव्य  पाणीटंचाईचा विचार करून पर्यायी व्यवस्थांसह पाणी  आरक्षणाबाबत उपाय योजना कसोशीने राबविण्याची  गरज आहे. 

४४ प्रकल्पांत ठणठणाटजिल्ह्यातील एकूण १२६ प्रकल्पांची उपयुक्त पाण्याची  टक्केवारी १९.७७ असली तरी, त्यामधील ४४ प्रकल्पांत  शून्य टक्के जलसाठा आहे, अर्थात हे प्रकल्प कोरडे  आहेत. त्याशिवाय १३ प्रकल्पांत ५ टक्क्यांपेक्षा कमी  जलसाठा आहे, तर ८ प्रकल्पांत १0 टक्क्यांच्या आत उ पुयक्त जलसाठा उरला आहे. जिल्ह्यातील मध्यम  प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पात केवळ १.४७ टक्के  जलसाठा उरला आहे, तर एकबुर्जी प्रकल्पात १५.८७  टक्के जलसाठा असून, अडाण प्रकल्पात २८.८७ टक्के  जलसाठा उपलब्ध आहे.