शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जलसाठय़ांची स्थिती चिंताजनक; पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:28 IST

यंदा पावसाळा संपत आला तरी सरासरीच्या  तुलनेत निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. परिणामी  जिल्ह्यातील मध्यम आणि लघू मिळून १२६ प्रकल्पांत  जलसंचयच झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४0  हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, जिल्ह्यातील  सर्व प्रकल्पांत मिळून  केवळ १९.७७ टक्के उपयुक्त  जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा जिल्हावासीयांना  हिवाळय़ापासूनच पाणीटंचाईच्या भीषण संकटाचा  सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली  आहे. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील चित्र प्रकल्पांमध्ये केवळ २0 टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा पावसाळा संपत आला तरी सरासरीच्या  तुलनेत निम्माही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. परिणामी  जिल्ह्यातील मध्यम आणि लघू मिळून १२६ प्रकल्पांत  जलसंचयच झाला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४0  हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, जिल्ह्यातील  सर्व प्रकल्पांत मिळून  केवळ १९.७७ टक्के उपयुक्त  जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा जिल्हावासीयांना  हिवाळय़ापासूनच पाणीटंचाईच्या भीषण संकटाचा  सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली  आहे. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७ सप्टेंबरपर्यं त केवळ ६२.१९ टक्के पाऊस झाला. साहजिकच कमी  पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२३ लघू  प्रकल्पांसह बॅरेजेस मिळून एकूण १२६ प्रकल्पांत केवळ  १९.७७ टक्के जलसाठा उरला आहे. मागील वर्षांंची  आकडेवारी लक्षात घेतल्यास यावर्षीची परिस्थिती गेल्या  नऊ वर्षांतील सर्वात भीषण असल्याचे स्पष्ट होत आहे.  यापूर्वी २00८ मध्ये १५ ऑक्टोबर रोजीच्या पाटबंधारे  विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या सर्व प्रकल्पांतील  मिळून एकूण उपयुक्त जलसाठय़ाची टक्केवारी २५.८३  टक्के, तर २00९ मध्ये उपयुक्त जलसाठय़ाची टक्केवारी  केवळ १८.0६ टक्के होती. यंदा सप्टेंबरच्या ७ तारखे पर्यंंतच जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ १९.७७ टक्के उ पयुक्त जलसाठा उरला आहे. आता मोठय़ा प्रमाणात  पाऊस येण्याची शक्यता मावळल्यात जमा असल्याने  जलप्रकल्पांची स्थिती अधिकच गंभीर होणार आहे.  त्यामुळे येत्या दोन महिन्यांत हिवाळय़ाच्या दिवसांतच  जिल्हाभरातील भीषण पाणीटंचाईचा सामना करावा  लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाणी आरक्षण समितीकडून तातडीच्या उपायांची गरजजिल्ह्यातील पाण्याबाबतची स्थिती लक्षात घेऊन  िपण्यासाठी पाणी आरक्षित करण्याच्या दृष्टीने दरवर्षी  ऑक्टोबर महिन्यात जिल्हाधिकारी तथा पाणी आरक्षण  समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या  अध्यक्षतेखाली पाणी आरक्षण समितीची बैठक  आयोजित करण्यात येते. यामध्ये जिल्ह्यातील  पाणीसाठय़ाचे प्रमाण आणि आवश्यकतेचा विचार  करून विविध यंत्रणाच्या मागणीनुसार पाणी आरक्षण  करण्याबाबत निर्णय घेण्यात येतात. आता या बैठकीला  महिनाभराचा कालावधी असल्याने जिल्ह्यातील संभाव्य  पाणीटंचाईचा विचार करून पर्यायी व्यवस्थांसह पाणी  आरक्षणाबाबत उपाय योजना कसोशीने राबविण्याची  गरज आहे. 

४४ प्रकल्पांत ठणठणाटजिल्ह्यातील एकूण १२६ प्रकल्पांची उपयुक्त पाण्याची  टक्केवारी १९.७७ असली तरी, त्यामधील ४४ प्रकल्पांत  शून्य टक्के जलसाठा आहे, अर्थात हे प्रकल्प कोरडे  आहेत. त्याशिवाय १३ प्रकल्पांत ५ टक्क्यांपेक्षा कमी  जलसाठा आहे, तर ८ प्रकल्पांत १0 टक्क्यांच्या आत उ पुयक्त जलसाठा उरला आहे. जिल्ह्यातील मध्यम  प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पात केवळ १.४७ टक्के  जलसाठा उरला आहे, तर एकबुर्जी प्रकल्पात १५.८७  टक्के जलसाठा असून, अडाण प्रकल्पात २८.८७ टक्के  जलसाठा उपलब्ध आहे.