शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

साहेब, या चिखलातून आणखी किती दिवस अंगणवाडीत जावे लागणार? चिमुकल्यांचा सवाल

By संतोष वानखडे | Updated: July 9, 2024 18:43 IST

स्थानिक प्रशासन रस्ता कामाकडे लक्ष देईना

वाशिम : आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षणावर जिल्हा प्रशासनाने ‘फोकस’ केले असतानाही, स्थानिक प्रशासन मात्र या गंभीर मुद्याकडे फारसे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चिखलमय रस्त्यावरून दिसून येते. लोणी बु. येथील झोपडपटीकडे जाणारा चिखलमय रस्ता तुडवत चिमुकल्यांना अंगणवाडी जावे लागत आहे.ग्रामीण भागात अद्यापही फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथील झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर चिखल होतो. हा रहदारीचा रस्ता असल्याने येथून नागरिकांची ये-जा असते. या रस्त्यानेच चिमुकल्या विद्यार्थ्यांना अंगणवाडीत जावे लागते.  पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. चिखलमय रस्ता पाहून अनेकदा चिमुकली मुले अंगणवाडी जाण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र, शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याने पालकवर्ग हा आपल्या पाल्याचे मन वळवित त्यांना अंगणवाडीत जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. 

चिखलातून वाट शोधत चिमुकले अंगणवाडी केंद्र गाठत आहेत. रस्ता दुरूस्तीची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतू, अद्यापही ना स्थानिक प्रशासनाने दखल घेतली, ना पंचायत समिती प्रशासनाने या रस्त्याबाबत चिमुकल्यांसह पालकांना आश्वस्त केले. शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळत नसेल तर चिमुकल्या मुलांच्या मनावर नकारात्मकेचे भाव उमटण्याची भीतीही पालकांमधून वर्तविली जात आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणावर विशेष भर दिल्याचे सर्वश्रूत आहे. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्रांचे रुपडे पालटण्यावर, इमारती बोलक्या करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील पालकवर्गही भारावून गेला असून, चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या आठ दिवसात या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिम