शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

वाशिम : सन १९१३ मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलेल्या ‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार राजेंद्र पाटणी ...

वाशिम : सन १९१३ मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलेल्या ‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या लोहमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठविले असून, या पत्राला गांभीर्याने घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कार्यवाही सुरू केल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.

१९४७ मध्ये देश हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला असला तरी ‘शकुंतला’ इंग्रजांच्याच ताब्यात होती. प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचा असलेला हा लोहमार्ग त्यानंतर इंग्लंडमधील निल्सन अँड निल्सन कंपनीच्या ताब्यात गेला होता. भारत सरकार आणि या कंपनीमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार हा लोहमार्ग भारत सरकारच्या ताब्यात आला. हा लोहमार्ग वाशिम, अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांतून जातो. विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात दळणवळणाची पुरेशी साधने नसताना ‘शकुंतले’ने चारही जिल्ह्यांतील नागरिकांना ती वानवा जाणवू दिली नव्हती. आता मात्र हीच शकुंतला मृत्युशय्येवर पडली आहे. हा लोहमार्ग कायमस्वरूपी बंद झाल्यास मूर्तिजापूर वगळता इतर सर्वच शहरे रेल्वेच्या नकाशावरून गायब होणार आहेत. नेमकी हीच बाब हेरून कारंजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शकुंतलेच्या लोहमार्गाचे गेज परिवर्तन करून शकुंतलेचा वनवास संपविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेटून व पत्रव्यवहार करून आ. पाटणी यांनी या लोहमार्गाच्या गेज परिवर्तनाच्या कामात लक्ष घालण्याची विनंती केली. गडकरींनीदेखील त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या कामात लक्ष घालण्यासाठी पत्र लिहिले आहे. गडकरींच्या पत्रानंतर रेल्वेमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

००००००

शकुंतलेच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी नितीन गडकरींना साकडे घातले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले असून, त्यांनीही सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

- राजेंद्र पाटणी,

आमदार कारंजा विधानसभा मतदारसंघ