शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

वाशिम : सन १९१३ मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलेल्या ‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार राजेंद्र पाटणी ...

वाशिम : सन १९१३ मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलेल्या ‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या लोहमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठविले असून, या पत्राला गांभीर्याने घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कार्यवाही सुरू केल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.

१९४७ मध्ये देश हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला असला तरी ‘शकुंतला’ इंग्रजांच्याच ताब्यात होती. प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचा असलेला हा लोहमार्ग त्यानंतर इंग्लंडमधील निल्सन अँड निल्सन कंपनीच्या ताब्यात गेला होता. भारत सरकार आणि या कंपनीमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार हा लोहमार्ग भारत सरकारच्या ताब्यात आला. हा लोहमार्ग वाशिम, अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांतून जातो. विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात दळणवळणाची पुरेशी साधने नसताना ‘शकुंतले’ने चारही जिल्ह्यांतील नागरिकांना ती वानवा जाणवू दिली नव्हती. आता मात्र हीच शकुंतला मृत्युशय्येवर पडली आहे. हा लोहमार्ग कायमस्वरूपी बंद झाल्यास मूर्तिजापूर वगळता इतर सर्वच शहरे रेल्वेच्या नकाशावरून गायब होणार आहेत. नेमकी हीच बाब हेरून कारंजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शकुंतलेच्या लोहमार्गाचे गेज परिवर्तन करून शकुंतलेचा वनवास संपविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेटून व पत्रव्यवहार करून आ. पाटणी यांनी या लोहमार्गाच्या गेज परिवर्तनाच्या कामात लक्ष घालण्याची विनंती केली. गडकरींनीदेखील त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या कामात लक्ष घालण्यासाठी पत्र लिहिले आहे. गडकरींच्या पत्रानंतर रेल्वेमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

००००००

शकुंतलेच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी नितीन गडकरींना साकडे घातले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले असून, त्यांनीही सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

- राजेंद्र पाटणी,

आमदार कारंजा विधानसभा मतदारसंघ