शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मानोरा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:44 IST

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आजवर जिल्ह्यात एकूण ४१ हजार ६४८ ...

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आजवर जिल्ह्यात एकूण ४१ हजार ६४८ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ४० हजार ९७६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर ६२२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ४९ व्यक्ती उपचाराखाली आहेत. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजारांवर व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, तर दुसऱ्या लाटेत ३३ हजार व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच ४०० पेक्षा अधिक व्यक्तींना जीव गमवावा लागला. मे २०२१ च्या अखेरपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण घटू लागले. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. त्यात मानोरा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यंत नगण्य असून, या तालुक्यात सद्यस्थितीत केवळ २ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

----------

९० टक्के ग्रामपंचायती कोरोनामुक्त

जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत मानोरा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यात गेल्या आठवडाभरात या तालुक्यात केवळ एका व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे या तालुक्यातील ७७ पैकी ७० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अर्थात तालुक्यातील ९० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट होत आहे.