शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘लोकमत’चा दणका : गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:38 IST

गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार २८ जुलै रोजी मतदान केंद्रांवर राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १५ जुलैपासून नवीन मतदारांची नोंदणी मोहिम राबविली जात आहे. मतदार नोंदणीपासून कुणीही वंचित राहू नये तसेच मतदार कार्डामधील चुकांची दुरूस्ती व्हावी याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक विभाग व गावपातळीवरील कर्मचाºयांची फौज नवमतदारांच्या सेवेत तैनात करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशीही मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मतदार नोंदणी मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यंत्रणेला दिले होते.मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी याकरीता जिल्हाधिकारी मोडक व संबंधित तहसिलदारांनी रविवार, २८ जुलै रोजी काही मतदानकेंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, लोकमत चमूने रिसोड शहरासह काही ठिकाणी दुपारच्या सुमारास मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली असता काही ठिकाणी कर्मचारी आढळून आले नाहीत तर काही ठिकाणी संबंधित मतदान केंद्र कुलूपबंद आढळून आले. यामध्ये रिसोड शहरातील सर्वाधिक सात मतदान केंद्रांचा समावेश होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करताच, प्रशासनाने दखल घेतली असून संबंधितांकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. रिसोड शहर व तालुक्यातील संबंधित मतदान केंद्रांची माहिती घेऊन सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तहसिलदार राजेश सुरडकर यांनी स्पष्ट केले.वाशिम तालुक्यातील पांडवउमरा परिसरातील मतदान केंद्रासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. मतदार नोंदणी करण्याचे आवाहनविशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी मोहिम १५ जुलैपासून जिल्ह्यात राबविली जात आहे. १५ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी आणि नाव नसल्यास ३० जुलैपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम