शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:17 IST

सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात लॉकडाऊनची नवीन नियमावली १ जुलैपासून लागू करण्यात आली होती. यामध्ये अंशत: बदल करून यापूर्वी परवानगी देण्यात आलेली सर्व दुकाने, आस्थापना ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ९ जुलै रोजी जारी केला.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आता ‘अनलॉक’च्या टप्प्यात शिथिलता दिली जात असून, यामुळे अर्थचक्र तसेच जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येते. ८ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी होती. यामध्ये ९ जुलै रोजी अंशत: बदल केला असून, आता सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकान, आस्थापनांमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्या व्यक्तींनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या आस्थापना, दुकानांवर गर्दी दिसून येईल, अशा आस्थापना, दुकाने तत्काळ बंद करण्यात येतील. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्यातील शाळा, धार्मिक स्थळे बंदच राहणारलॉकडाऊनची नवीन नियमावली १ जुलैपासून जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तसेच धार्मिक स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश राहणार नाही. ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील, याची खात्री संबधित शाळेच्या प्रशासनाने करावी, तसेच पालकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्यात येऊ नये, असे आदेशात नमूद आहे.

 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक