शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

सव्वाशे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:36 IST

देपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती. या संदर्भात शासन, प्रशासनदरबारी पाठपुरावा केल्यानंतर अखेर पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेत शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू केले आहे. वारा जहॉगिर येथे २०१५ मध्ये पाटबंधारे विभागाच्यावतीने लघू प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा देपूळ ते पार्डी रस्ता बुडित क्षेत्रात गेला. त्यामुळे १३० शेतकºयांची हजारो एकर शेती संकटात सापडली. शेतीत शेतमाल, शेती अवजारे आणि इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर ही वाहने नेणेच शेतकºयांना अशक्य झाले. परिणामी अनेकांची शेती पडित राहू लागली होती. पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी या रस्त्यासाठी नियोजन न केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. त्यानंतर शेतकºयांनी बुडित क्षेत्रात गेलेल्या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजविले, जिल्हाधिकाºयांसह प्रशासन दरबारीही निवेदन दिले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे विद्यमान कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव यांनी या रस्त्यामुळे होत असलेली शेतकºयांची अडचण लक्षात घेतली आणि रस्त्याच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेची तरतूद केली. तथापि, सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने रस्त्याचे कामही रखडणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करीत वरिष्ठस्तरावरून रस्ता कामासाठी परवानगी घेत निविदा प्रक्रिया पूर्ण केली. आता या रस्त्याचे कामही सुरु झाले असून, या रस्त्यामुळे परिसरातील १३० शेतकºयांच्या शेती वहितीचा प्रश्न निकाली लागला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीDamधरण