शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याचे सत्र, शेतकऱ्यांचे जागरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:49 IST

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देरिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे.पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण असून, नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सोयाबीनच्या सुड्यांच्या रखवालीसाठी जागरण करीत आहेत. जिल्ह्यात गत काही वर्षांत या पिकाचा पेरा एकूण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांहून अधिक होत आहे. यंदाही जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झालेली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २ लाख ८७ हजारांहून अधिक होते. आता हे पीक काढणीवर आले आहे.  उन्हाचा पारा वाढत असल्याने पूर्णपणे सुकलेल्या सोयाबीनच्या शेंगा फुटून दाणे खाली पडत असल्याने शेतकरी कापणीची घाई करीत आहेत. एकाचवेळी अनेक शेतकºयांकडून मजुरांची मागणी होत असल्याने शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कापून ठेवलेले सोयाबीन काढण्याचीही घाई असल्याने मळणीयंत्रांची मागणी वाढल्याने ते मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीनच्या सुड्या लावून ठेवत आहेत. त्यातच सुड्या जळण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे. गत तीन दिवसांत रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे. राबराब राबतानाच मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर हाताशी आलेल्या पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी