शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याचे सत्र, शेतकऱ्यांचे जागरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:49 IST

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देरिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे.पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण असून, नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सोयाबीनच्या सुड्यांच्या रखवालीसाठी जागरण करीत आहेत. जिल्ह्यात गत काही वर्षांत या पिकाचा पेरा एकूण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांहून अधिक होत आहे. यंदाही जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झालेली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २ लाख ८७ हजारांहून अधिक होते. आता हे पीक काढणीवर आले आहे.  उन्हाचा पारा वाढत असल्याने पूर्णपणे सुकलेल्या सोयाबीनच्या शेंगा फुटून दाणे खाली पडत असल्याने शेतकरी कापणीची घाई करीत आहेत. एकाचवेळी अनेक शेतकºयांकडून मजुरांची मागणी होत असल्याने शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कापून ठेवलेले सोयाबीन काढण्याचीही घाई असल्याने मळणीयंत्रांची मागणी वाढल्याने ते मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीनच्या सुड्या लावून ठेवत आहेत. त्यातच सुड्या जळण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे. गत तीन दिवसांत रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे. राबराब राबतानाच मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर हाताशी आलेल्या पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी