शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

वाशिम जिल्ह्यात  सोयाबीनच्या सुडयांना आग लावण्याचे सत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:30 IST

वाशिम :  शेतकरी यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच अडचणीत असताना त्यान मानवनिर्मित संकटांचीही भर पडत असल्याचे दिसत आहे. अल्प पावसामुळे हाती आलेले थोडेफार सोयाबीन शेतकºयांनी सोंगून शेतात ठेवले आहे. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यात गत १५ दिवसांत अशा ६ घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून, ...

ठळक मुद्दे १५ दिवसांत ६ घटना  शेतकरी संकटात

वाशिम :  शेतकरी यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच अडचणीत असताना त्यान मानवनिर्मित संकटांचीही भर पडत असल्याचे दिसत आहे. अल्प पावसामुळे हाती आलेले थोडेफार सोयाबीन शेतकºयांनी सोंगून शेतात ठेवले आहे. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यात गत १५ दिवसांत अशा ६ घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून, या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे गरजेचे झाले आहे.

यंदा अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे अधिक नुकसान झाले असून, अनेक शेतकºयांना या पावसामुळे सोयाबीन काढण्यास विलंब लागला. आता शेतकºयांनी हे सोयाबीन सोंगून ठेवले असून, बाजारात अपेक्षीत भाव मिळण्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणीची अनेकांनी घाई केली नाही. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या शेतात लावण्यात आल्या आहेत. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. वाशिम तालुक्यात अशा तीन घटना घडल्या असून, त्यामध्ये २७ आॅक्टोबर रोजी पार्डी आसरा येथील घटनेचा समावेश आहे. त्याशिवाय, कारंजा, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातही अशा घटना घडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले असून, रात्रीच्या वेळी ते सोयाबीन सुड्यांची राखण करीत शेतात जागत आहेत. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अशा घटनांमागे सक्रीय असलेल्या लोकांना लवकर पकडून त्यांना कठोर शासन करण्याची गरज आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी