शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वाशिम जिल्ह्यात  सोयाबीनच्या सुडयांना आग लावण्याचे सत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:30 IST

वाशिम :  शेतकरी यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच अडचणीत असताना त्यान मानवनिर्मित संकटांचीही भर पडत असल्याचे दिसत आहे. अल्प पावसामुळे हाती आलेले थोडेफार सोयाबीन शेतकºयांनी सोंगून शेतात ठेवले आहे. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यात गत १५ दिवसांत अशा ६ घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून, ...

ठळक मुद्दे १५ दिवसांत ६ घटना  शेतकरी संकटात

वाशिम :  शेतकरी यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच अडचणीत असताना त्यान मानवनिर्मित संकटांचीही भर पडत असल्याचे दिसत आहे. अल्प पावसामुळे हाती आलेले थोडेफार सोयाबीन शेतकºयांनी सोंगून शेतात ठेवले आहे. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यात गत १५ दिवसांत अशा ६ घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून, या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे गरजेचे झाले आहे.

यंदा अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे अधिक नुकसान झाले असून, अनेक शेतकºयांना या पावसामुळे सोयाबीन काढण्यास विलंब लागला. आता शेतकºयांनी हे सोयाबीन सोंगून ठेवले असून, बाजारात अपेक्षीत भाव मिळण्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणीची अनेकांनी घाई केली नाही. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या शेतात लावण्यात आल्या आहेत. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. वाशिम तालुक्यात अशा तीन घटना घडल्या असून, त्यामध्ये २७ आॅक्टोबर रोजी पार्डी आसरा येथील घटनेचा समावेश आहे. त्याशिवाय, कारंजा, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातही अशा घटना घडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले असून, रात्रीच्या वेळी ते सोयाबीन सुड्यांची राखण करीत शेतात जागत आहेत. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अशा घटनांमागे सक्रीय असलेल्या लोकांना लवकर पकडून त्यांना कठोर शासन करण्याची गरज आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी