शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:37 IST

बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे.

लोकमत न्युज नेटवर्क राजुरा (वाशिम) : खरीप पेरणी तोंडावर असतांना शेतकरी वर्ग बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी आर्थिक जुळवा जुळव करण्यात गुंतला आहे, मात्र गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे.गत वर्षी खरीप पिकावर किडीचा प्रादूर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देतांना  बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र  दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, उडीद, मुग, आदि पिकांची मोठी हानी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला मोड फुटले. ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. त्यानंतर  कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊन संचारबंदीचा फटका भाजीपाला, फळ, उत्पादकांना बसला. थकबाकीदार शेतकºयांच्या पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम असल्याने खरिपाचे पीककर्ज वाटप अद्यापही प्रलंबीत आहे. परिणामी शेतकºयाना खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यात अनुदानावर खते, बियाणे मिळण्याची आशा धुसर दिसत असताना बियाणे दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणे विविध वानाची बॅग, १ हजार ७०० रुपये ते १ हजार ९०० पन्नास रुपयांपर्यंत भाव होते तर या वर्षी २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपये प्रती बॅगेचे दर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी उडीद, मूग, बियाणे प्रती किलो १२० रुपये होते, यंदा मात्र  हे बियाणे प्रति किलो १८० रुपयांपर्यंत वाढले आहे, तर तुरीच्या बियाण्यात सुध्दा १० ते २० रुपये प्रती किलो भाववाढ झाल्याचे समजते.

दरवर्षी उदभवणाºया अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकºयांना सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच  यावर्षी बियाणे दरवाढीचे संकट शेतकºयासमोर उभे ठाकल्याने शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. - अनिल अहाळे,शेतकरी, राजुरा 

  ओल्या दुष्काळाने खरीपातील सोयाबीन पावसात भिजले त्यामुळे, कंपन्यामध्ये अपेक्षीत बियाणे उत्पादन होऊ शकले नाही यावर्षी सोयाबीन बियाणे दरात मोठी वाढ झाली.कैलास भांडेकर, संचालक, माऊली कृषी सेवा केंद्र, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी