शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना सोयाबीन दरवाढीची प्रतीक्षा, आवक मंदावली, व्यापा-यांकडून भावात किंचित वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 11:18 IST

 वाशिम -  यंदा अपु-या पावसामुळे शेती उत्पादनात प्रचंड घट आली असली तरी, बाजारात अपेक्षीत भाव मिळत नसल्याचे दिसते. विविध अडचणींमुळे सुरुवातीला थोडेफार सोयाबीन विकणा-या शेतक-यांनी आता मात्र भाववाढीच्या अपेक्षेने विक्री थांबविल्याचे चित्र बाजारातील आवकीवरून स्पष्ट होत आहे. वाशिम येथे गत १५ दिवसांपूर्वी होत असलेली ६ हजार क्विंटलची आवक आता ४ ...

 वाशिम -  यंदा अपु-या पावसामुळे शेती उत्पादनात प्रचंड घट आली असली तरी, बाजारात अपेक्षीत भाव मिळत नसल्याचे दिसते. विविध अडचणींमुळे सुरुवातीला थोडेफार सोयाबीन विकणा-या शेतक-यांनी आता मात्र भाववाढीच्या अपेक्षेने विक्री थांबविल्याचे चित्र बाजारातील आवकीवरून स्पष्ट होत आहे. वाशिम येथे गत १५ दिवसांपूर्वी होत असलेली ६ हजार क्विंटलची आवक आता ४ हजारांवर आली आहे, तर कारंजातही १० हजारांवरून सहा हजारांवर आवक घटली आहे. 

यंदा वाशिम जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु अपु-या पावसामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक शेतकºयांना सोयाबीनवर केलेला खर्चही वसुल झाला नाही. त्यातच बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले होते. शासनाने नाफेडसाठी सोयाबीन खरेदी सुरू केली असली तरी, त्या ठिकाणी लावण्यात येणारे जाचक निकष पाहता व्यापारी आणि नाफेडच्या खरेदीत कोणताच फरक दिसत नाही. नाफेडच्या केंद्रावर सोयाबीन चाळणी करून आणि ओलावा तपासून खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे वजन आणि भावात घट होतेच आहे. तर बाजारात व्यापारी माल पाहून लिलावात बोली बोलत असल्याने भाव कमीच मिळतात. त्यामुळे शासनाकडून आधीच कमी ठरविण्यात आलेल्या ३०५० रुपये प्रति क्विंटल हमीभावाचाही काहीच फायदा शेतकºयांना होत नाही. तथापि, सुरुवातीला खरीपातील घेणीदेणी आणि रब्बीच्या तयारीसाठी शेतकºयांनी सोयाबीन विकले; परंतु आता मात्र शेतकºयांना सोयाबीनमध्ये भाववाढ होण्याची अपेक्षा असल्याने अनेक शेतकºयांनी सोयाबीन विक्री थांबविली आहे. नाफेडच्या केंद्रावरही एफएक्यू दर्जाचे सोयाबीन हमीभावात विक ण्यात शेतकºयांना उत्साह दिसत नाही. बाजारातील आवक कमी होत असल्याचे पाहून व्यापाºयांनी या शेतमालाच्या दरात किंचित वाढही केली आहे. पूर्वी २३५० ते २६५० रुपये प्रति क्विंटल खरेदी के ले जाणारे चागल्या दर्जाचे सोयाबीन आता २९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सध्या सोयाबीनमध्ये ओलावा उरलेला नाही आणि हलक्या दर्जाचेही सोयाबीन आता उरलेले नाही. त्यामुळे व्यापाºयांकडून दरवाढ करण्यात येत असली तरी ती शेतकºयांना पुरेशी वाटतच नाही. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक घटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

 नाफेडकडील नोंदणीलाही प्रतिसाद नाही

यंदा नाफेडच्या खरेदीसाठी प्रशासनाकडून शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करून घेण्यात आली. जिल्ह्यातील सहाही केंद्रांवर या अंतर्गत हजारो शेतक-यांनी नोंदणीही केली. आता त्यामधील शेतक-यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून सोयाबीन आणण्याची सूचना दिली जात आहे; परंतु त्यालाही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. वाशिम येथील नाफेडच्या केंद्रावर शुक्रवारी नोंदणी झालेल्या ३० शेतकºयांशी सोयाबीन घेऊन येण्यासाठी संबंधित प्रशासनाने संपर्क साधला; परंतु त्यामधील केवळ दोन शेतकरी प्रत्यक्ष सोयाबीन विक्रीसाठी नाफेडच्या कें द्रावर दाखल झाले. हीच स्थिती मंगरुळपीर, मानोरा, कारंजा या ठिकाणीही असल्याचे समजते. त्यामुळे नाफेडकडेही सोयाबीन विकण्यात शेतकरी तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र