शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

शेतक-यांना सोयाबीन दरवाढीची प्रतीक्षा, आवक मंदावली, व्यापा-यांकडून भावात किंचित वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 11:18 IST

 वाशिम -  यंदा अपु-या पावसामुळे शेती उत्पादनात प्रचंड घट आली असली तरी, बाजारात अपेक्षीत भाव मिळत नसल्याचे दिसते. विविध अडचणींमुळे सुरुवातीला थोडेफार सोयाबीन विकणा-या शेतक-यांनी आता मात्र भाववाढीच्या अपेक्षेने विक्री थांबविल्याचे चित्र बाजारातील आवकीवरून स्पष्ट होत आहे. वाशिम येथे गत १५ दिवसांपूर्वी होत असलेली ६ हजार क्विंटलची आवक आता ४ ...

 वाशिम -  यंदा अपु-या पावसामुळे शेती उत्पादनात प्रचंड घट आली असली तरी, बाजारात अपेक्षीत भाव मिळत नसल्याचे दिसते. विविध अडचणींमुळे सुरुवातीला थोडेफार सोयाबीन विकणा-या शेतक-यांनी आता मात्र भाववाढीच्या अपेक्षेने विक्री थांबविल्याचे चित्र बाजारातील आवकीवरून स्पष्ट होत आहे. वाशिम येथे गत १५ दिवसांपूर्वी होत असलेली ६ हजार क्विंटलची आवक आता ४ हजारांवर आली आहे, तर कारंजातही १० हजारांवरून सहा हजारांवर आवक घटली आहे. 

यंदा वाशिम जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु अपु-या पावसामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक शेतकºयांना सोयाबीनवर केलेला खर्चही वसुल झाला नाही. त्यातच बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले होते. शासनाने नाफेडसाठी सोयाबीन खरेदी सुरू केली असली तरी, त्या ठिकाणी लावण्यात येणारे जाचक निकष पाहता व्यापारी आणि नाफेडच्या खरेदीत कोणताच फरक दिसत नाही. नाफेडच्या केंद्रावर सोयाबीन चाळणी करून आणि ओलावा तपासून खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे वजन आणि भावात घट होतेच आहे. तर बाजारात व्यापारी माल पाहून लिलावात बोली बोलत असल्याने भाव कमीच मिळतात. त्यामुळे शासनाकडून आधीच कमी ठरविण्यात आलेल्या ३०५० रुपये प्रति क्विंटल हमीभावाचाही काहीच फायदा शेतकºयांना होत नाही. तथापि, सुरुवातीला खरीपातील घेणीदेणी आणि रब्बीच्या तयारीसाठी शेतकºयांनी सोयाबीन विकले; परंतु आता मात्र शेतकºयांना सोयाबीनमध्ये भाववाढ होण्याची अपेक्षा असल्याने अनेक शेतकºयांनी सोयाबीन विक्री थांबविली आहे. नाफेडच्या केंद्रावरही एफएक्यू दर्जाचे सोयाबीन हमीभावात विक ण्यात शेतकºयांना उत्साह दिसत नाही. बाजारातील आवक कमी होत असल्याचे पाहून व्यापाºयांनी या शेतमालाच्या दरात किंचित वाढही केली आहे. पूर्वी २३५० ते २६५० रुपये प्रति क्विंटल खरेदी के ले जाणारे चागल्या दर्जाचे सोयाबीन आता २९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सध्या सोयाबीनमध्ये ओलावा उरलेला नाही आणि हलक्या दर्जाचेही सोयाबीन आता उरलेले नाही. त्यामुळे व्यापाºयांकडून दरवाढ करण्यात येत असली तरी ती शेतकºयांना पुरेशी वाटतच नाही. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक घटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

 नाफेडकडील नोंदणीलाही प्रतिसाद नाही

यंदा नाफेडच्या खरेदीसाठी प्रशासनाकडून शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करून घेण्यात आली. जिल्ह्यातील सहाही केंद्रांवर या अंतर्गत हजारो शेतक-यांनी नोंदणीही केली. आता त्यामधील शेतक-यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून सोयाबीन आणण्याची सूचना दिली जात आहे; परंतु त्यालाही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. वाशिम येथील नाफेडच्या केंद्रावर शुक्रवारी नोंदणी झालेल्या ३० शेतकºयांशी सोयाबीन घेऊन येण्यासाठी संबंधित प्रशासनाने संपर्क साधला; परंतु त्यामधील केवळ दोन शेतकरी प्रत्यक्ष सोयाबीन विक्रीसाठी नाफेडच्या कें द्रावर दाखल झाले. हीच स्थिती मंगरुळपीर, मानोरा, कारंजा या ठिकाणीही असल्याचे समजते. त्यामुळे नाफेडकडेही सोयाबीन विकण्यात शेतकरी तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र