शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘लोकमत’चा दणका : पोषण आहारासाठी शाळांना मिळाले अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:33 IST

‘लोकमत’ने २० फेब्रुवारी रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. धान्य न मिळालेल्या काही शाळांना त्याच दिवशी धान्याचा पुरवठा झाला.

वाशिम : पोषण आहारासाठी लागणारे तांदूळ व धान्यादी माल संबंधित शाळांना मिळाला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. रिसोड तालुक्यातील ४ शाळांना धान्याची गरज नसल्याने त्या शाळांनी नव्याने आलेला माल परत केला, अशी माहिती शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिली.विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढविणे, आहारातून पोषक तत्वे मिळावी, गरजू विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेता यावा या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा करार १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात आला. धान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून संबंधित कंत्राटदारालाच जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे अन्नधान्य पुरविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन महिन्यांचे धान्य संबंधित शाळांना पुरविताना संबंधित कंत्राटदारांची दमछाक झाली. विशेषत: रिसोड तालुक्यातील काही खासगी अनुदानित शाळांना विलंबाने धान्याचा पुरवठा झाला तर काही शाळांना धान्य मिळणे बाकी होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने २० फेब्रुवारी रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. धान्य न मिळालेल्या काही शाळांना त्याच दिवशी धान्याचा पुरवठा झाला. रिसोड तालुक्यातील चार शाळांकडे धान्यसाठा असल्याने त्यांनी नवीन धान्य परत पाठविले.

शालेय पोषण आहारासाठी लागणारे धान्य संपले होते. २० फेब्रुवारी रोजी आमच्या शाळेला तांदूळ प्राप्त झाले.-भारत पवार,राजस्थान प्राथमिक मराठी शाळा रिसोड

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा