शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉल उभारणार - संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:39 IST

वाशिम: जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाºया वस्तू तसेच शेतकरी गटांच्या उत्पादनांना जिल्हास्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने वाशिम येथे या वस्तूंचा मॉल उभारण्यात येणार आहे. यासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ३० मार्चला येथे केले.

ठळक मुद्देजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाºया वस्तू तसेच शेतकरी गटांच्या उत्पादनांना जिल्हास्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने वाशिम येथे या वस्तूंचा मॉल उभारण्यात येणार आहे. यासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ३० मार्चला येथे केले. जुनी जिल्हा परिषद परिसरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती पानुताई जाधव, अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन माने आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रदर्शनीत उभारण्यात आलेल्या स्टॉलला भेट दिली. पालकमंत्री  ाठोड म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला बचत गट, शेतकरी गटांची उत्पादने, वस्तूंना जिल्हास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या उत्पादने, वस्तूंच्या विक्रीसाठी वाशिम येथे मॉलची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने इतर आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी होणाºया या मॉलमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गट व शेतकरी गटांची उत्पादने एकाच छताखाली खरेदीची संधी ग्राहकांना मिळेल. या माध्यमातून बचत गट, शेतकरी गटाच्या अर्थकारणाला गती मिळेल व महिला बचत गटांच्या गटांच्या चळवळीला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. महिला बचत गटांना अधिकाधिक मदत करून त्यांच्या उद्योग, व्यवसायात सहाय्य करण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. बचत गटांनी पारंपारिक वस्तू, उत्पादनांसोबत नवीन क्षेत्रातील संधींचा सुध्दा शोध घेऊन त्यानुसार व्यवसाय सुरु केला पाहिजे. या व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य मिळविण्यासाठी त्यांना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण घेता येईल. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयोजित केलेली तीन दिवशीय प्रदर्शनी महिला बचत गटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केले.

टॅग्स :washimवाशिमSanjay Rathodसंजय राठोड