शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजय कुटे विधानसभेत आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:39 AM

कापसाचा पेटंट परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्त्यांना शासकीय कापूस खरेदीसाठी रस्त्यावर उतरून आदोलन ...

कापसाचा पेटंट परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्त्यांना शासकीय कापूस खरेदीसाठी रस्त्यावर उतरून आदोलन करावे लागते. आंदोलनामुळे नावाला कापूस खरेदी सुरु होते, पण आठवड्यातून केवळ दोन दिवस, हे कुठले धोरण आहे, असा प्रश्न उपस्थित करून कुटे यांनी शेतकऱ्यांची व्यथाच सभागृहात माडली. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या आदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रकार होतो, अशी खंत व्यक्त करुन कापूस खरेदीच्या भाववाढीचा लाभ थेट शेतकऱ्यांना देण्याची मागणी आमदार कुटे यांनी लावून धरली.

यावर्षी कोरोना प्रदूर्भावाचा प्रभाव शेतीवरही पडला. यावर्षी पेरणीच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना संजीवनी देणाऱ्या कापूस पिकाकडे शेतकरी वळला. पीक जोमाने बहरत असताना बोंडअळीच्या कहराने कापसाची नासाडी झाली, जेमतेम घरात आलेल्या कापसाला शासनाच्या सीसीआय व पणन खरेदीला उशीर झाल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करुन चांगभले करुन घेतले. आज कापसाच्या भावात तेजी आली, परंतु कापूस शेतकऱ्यांजवळ नाही. मग यात दोष कोणाचा, हा गंभीर मुद्दा आमदार संजय कुटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. शासनाने व्यापाऱ्यांच्या हितासाठीच सीसीआय केंद्र उशिरा सुरू करण्याचा डाव खेळला, असा आरोप त्यांनी केल्याची माहिती शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी दिली.