शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मंजूर झालेले टँकर गावात पोहचलेच नाहीत! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 14:51 IST

६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही. 

- अरूण बळी मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावात गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई असून, ग्रामस्थांना पाणासाठी भटकंती करावी लागत आहे. या समस्येवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली. त्यानंतर ६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही. मालेगाव तालुक्यात ११४ गावे आहेत. त्यापैकी २८ गावात तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून ३० ग्रामपंचायतीनी विहिरी कूपनलिका अधिग्रहणाचे तर ८ ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी विहिरी कूपनलिकाचे २६ तर ६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयाले पाठविण्यात आले होते. त्यापैकी विहिरी, कूपननलिकेचे ११ प्रस्ताव चर ६ टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यात राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि पिंपळवाडीसह इतर गावांत टँकर मंजूर झाले होते. त्यामुळे टँकर गावात पोहचून ग्रामस्थाना पाणी मिळेल अशी आशा वाटू लागली होती; परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळ मंजूर झालेल्या ६ टँकर पैैकी खैरखेडा वगळता अद्याप एकाही गावात टँकर पोहचलेच नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. घडाभर पाण्यासाठी मैलभर भटकणाºया ग्रामस्थांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असून, मंजूर झालेले टँकर पावसाळ्यात गावात पोहोचणार काय, असा  प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात तीन महिन्यांपासून पाण्यासाठी भटकत असणाºया ग्रामस्थांसाठी सुविधा म्हणून २० दिवसांपूर्वी टँकर मंजूर करण्यात आले खरे; परंतु अद्यापही ६ पैकी पाच गावांत टँकरच पोहोचले नाही. त्यामुळे कागदोपत्री उपाय योजना दाखवून ग्रामस्थांची हेटाळणी करण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या या कृतीबाबत पाणीटंचाईचा सामना करणाºया गावांत प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आता गावात टँकरची प्रतिक्षा करणारे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. 

टँकर मंजूर झालेल्या गावांत येत्या दोन दिवसात टँकर पोहचले नाही, तर मालेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला सुरुवात करू.-अन्नपूर्णा दिलीप भुरकांडे -पं. स. सदस्या

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई