शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

मंजूर झालेले टँकर गावात पोहचलेच नाहीत! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 14:51 IST

६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही. 

- अरूण बळी मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावात गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई असून, ग्रामस्थांना पाणासाठी भटकंती करावी लागत आहे. या समस्येवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी केली. त्यानंतर ६ गावांत टँकर मंजुरही झाले; परंतु आता २० दिवस उलटले तरी, या ६ पैकी खैरखेडा वगळता एकाही टँकर गावात पोहचलेच नाही. मालेगाव तालुक्यात ११४ गावे आहेत. त्यापैकी २८ गावात तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून ३० ग्रामपंचायतीनी विहिरी कूपनलिका अधिग्रहणाचे तर ८ ग्रामपंचायतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी विहिरी कूपनलिकाचे २६ तर ६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयाले पाठविण्यात आले होते. त्यापैकी विहिरी, कूपननलिकेचे ११ प्रस्ताव चर ६ टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यात राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि पिंपळवाडीसह इतर गावांत टँकर मंजूर झाले होते. त्यामुळे टँकर गावात पोहचून ग्रामस्थाना पाणी मिळेल अशी आशा वाटू लागली होती; परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळ मंजूर झालेल्या ६ टँकर पैैकी खैरखेडा वगळता अद्याप एकाही गावात टँकर पोहचलेच नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. घडाभर पाण्यासाठी मैलभर भटकणाºया ग्रामस्थांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असून, मंजूर झालेले टँकर पावसाळ्यात गावात पोहोचणार काय, असा  प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात तीन महिन्यांपासून पाण्यासाठी भटकत असणाºया ग्रामस्थांसाठी सुविधा म्हणून २० दिवसांपूर्वी टँकर मंजूर करण्यात आले खरे; परंतु अद्यापही ६ पैकी पाच गावांत टँकरच पोहोचले नाही. त्यामुळे कागदोपत्री उपाय योजना दाखवून ग्रामस्थांची हेटाळणी करण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या या कृतीबाबत पाणीटंचाईचा सामना करणाºया गावांत प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आता गावात टँकरची प्रतिक्षा करणारे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. 

टँकर मंजूर झालेल्या गावांत येत्या दोन दिवसात टँकर पोहचले नाही, तर मालेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला सुरुवात करू.-अन्नपूर्णा दिलीप भुरकांडे -पं. स. सदस्या

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई