शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

गौरी स्थापनेकरिता साकारला अंतराळाचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

शेलूबाजार : गणपतीच्या बरोबरच गौरीचा सणही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील साईनगरमधील रहिवासी पांडुरंग भगवान बेद्रे यांनी ...

शेलूबाजार : गणपतीच्या बरोबरच गौरीचा सणही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील साईनगरमधील रहिवासी पांडुरंग भगवान बेद्रे यांनी यावर्षी अंतराळाचा सुंदर असा देखावा तयार करून गौरीची स्थापना केली आहे. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

काही कुटुंबांत धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. काहीजण पत्र्याच्या, लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवूनदेखील पूजा केली जाते. तर काही लोक गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. मात्र, येथील पांडुरंग बेद्रे हे दरवर्षी संकल्पनेतून विविध देखावे तयार करून गौरीची स्थापना करतात. यावर्षी त्यांनी अंतराळाचा सुंदर असा देखावा साकारला आहे. त्यामध्ये सूर्य, चंद्र, ग्रहणाचा हुबेहूब देखावा निर्माण केला आहे.

या आगळ्या वेगळ्या गौरीकडील देखावा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. यापूर्वी त्यांनी अमरनाथ गुहा तयार करून त्यात गौरीची स्थापना केली होती. मात्र, यंदा त्यांनी अंतराळाचा सुंदर असा देखावा तयार करून गौरीची स्थापना मोठ्या थाटात केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून ते स्वत: व त्यांची पत्नी जयश्री यांनी हा सुंदर देखावा तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.