शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST

गतवर्षापासून शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. १९ फेब्रुवारीच्या गारपीट वादळी पावसाने ...

गतवर्षापासून शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. १९ फेब्रुवारीच्या गारपीट वादळी पावसाने शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा मोबदला अजून तर हाती पडलाच नाही. पण त्यातून काही प्रमाणात वाचलेले हळद, बिजवाई कांदा हे पीक काढणी सुरू आहे. अशातच १३ एप्रिल गुढीपाडव्याचा अर्थातच मराठी वर्षाचा मुहूर्ताचा दिवस. कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्व मानवी समाज त्रस्त असताना किमान निसर्ग तरी शेतकऱ्यांना साथ देईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. गुढीपाडव्याची गुढी उभारून शेतकरी आपापल्या शेतात गेले. हळद काढणी, कांदा बिज काढणी सुरू असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास आकाशात ढग जमा झाले. वादळी वारा सुटला आणि पावसाची भुरभुर सुरू झाली. यामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाल्याचे चित्र शिरपूर परिसरात पाहायला मिळाले.