शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नऊ वर्षांनंतर प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ; ग्रामसेवकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 19:01 IST

Washim News : संघटनेच्या मागणीनुसार तीन हजार रुपयाने वाढ करावी, असा सूर ग्रामसेवक संघटनेमधून उमटत आहे.

वाशिम : ग्रामविकास विभागाने ९ वर्षांनंतर ९ जून रोजी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, महागाईच्या काळात ही वाढ तोकडी असून, संघटनेच्या मागणीनुसार तीन हजार रुपयाने वाढ करावी, असा सूर ग्रामसेवक संघटनेमधून उमटत आहे.

गावपातळीवर मूलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असून, त्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकांसाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येते, तसेच ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणी पुरवठा, आरोग्य संबंधित साहित्य व अन्य प्रशासकीय कामाकरिता तालुका स्तरावर जावे लागते. यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१२ पासून दरमहा ११०० रुपये कायम प्रवास भत्ता देण्यात येतो. दरम्यान, महागाईच्या काळात प्रवास भत्त्यात वाढ करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली होती. ही मागणी लक्षात घेता ग्रामविकास विभागाने ९ जून रोजी प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली आहे. नऊ वर्षाच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात जवळपास दुपटीने वाढ होत असताना आणि महागाई वाढलेली असताना प्रवास भत्त्यात केवळ ४०० रुपयांची वाढ झाल्याने ग्रामसेवक संघटनेमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रवास भत्त्यात किमान तीन हजार रुपये वाढ करावी, अशी मागणी संघटनेने केली.

 

काय म्हणतात ग्रामसेवक? 

नऊ वर्षांपासून ग्रामसेवकांना ११०० रुपये प्रवास भत्ता मिळत आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने प्रवास भत्ता तीन हजार रुपये करावा, अशी ग्रामसेवक संघटनेने शासनदरबारी मागणी केलेली आहे. यामध्ये केवळ ४०० रुपये वाढ करण्यात आली. किमान तीन हजार रुपये प्रवास भत्ता असणे अपेक्षित आहे.

- आत्माराम नवघरे

जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

टॅग्स :washimवाशिम