शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नऊ वर्षांनंतर प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ; ग्रामसेवकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 19:01 IST

Washim News : संघटनेच्या मागणीनुसार तीन हजार रुपयाने वाढ करावी, असा सूर ग्रामसेवक संघटनेमधून उमटत आहे.

वाशिम : ग्रामविकास विभागाने ९ वर्षांनंतर ९ जून रोजी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, महागाईच्या काळात ही वाढ तोकडी असून, संघटनेच्या मागणीनुसार तीन हजार रुपयाने वाढ करावी, असा सूर ग्रामसेवक संघटनेमधून उमटत आहे.

गावपातळीवर मूलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असून, त्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकांसाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येते, तसेच ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणी पुरवठा, आरोग्य संबंधित साहित्य व अन्य प्रशासकीय कामाकरिता तालुका स्तरावर जावे लागते. यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१२ पासून दरमहा ११०० रुपये कायम प्रवास भत्ता देण्यात येतो. दरम्यान, महागाईच्या काळात प्रवास भत्त्यात वाढ करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली होती. ही मागणी लक्षात घेता ग्रामविकास विभागाने ९ जून रोजी प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली आहे. नऊ वर्षाच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात जवळपास दुपटीने वाढ होत असताना आणि महागाई वाढलेली असताना प्रवास भत्त्यात केवळ ४०० रुपयांची वाढ झाल्याने ग्रामसेवक संघटनेमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रवास भत्त्यात किमान तीन हजार रुपये वाढ करावी, अशी मागणी संघटनेने केली.

 

काय म्हणतात ग्रामसेवक? 

नऊ वर्षांपासून ग्रामसेवकांना ११०० रुपये प्रवास भत्ता मिळत आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने प्रवास भत्ता तीन हजार रुपये करावा, अशी ग्रामसेवक संघटनेने शासनदरबारी मागणी केलेली आहे. यामध्ये केवळ ४०० रुपये वाढ करण्यात आली. किमान तीन हजार रुपये प्रवास भत्ता असणे अपेक्षित आहे.

- आत्माराम नवघरे

जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

टॅग्स :washimवाशिम