शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तिसरी लाट रोखण्यात पालकांची भूमिका ठरणार महत्त्वाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:29 IST

वाशिम : दुसरी लाट ओसरत नाही, तोच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक ...

वाशिम : दुसरी लाट ओसरत नाही, तोच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याबाबत मत-मतांतरे असले तरी पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतल्यास ही तिसरी लाट रोखता येऊ शकते, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला.

पहिल्या लाटेत ज्येष्ठ, दुसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग झाला. तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने पूर्वतयारी सुरू केली. त्याचप्रमाणे पालकांनीदेखील आपल्या पाल्याच्या आरोग्याबाबत पावसाळ्याच्या दिवसात विशेष काळजी घेणे आवश्यक ठरत आहे. अति काळजी किंवा भीती न बाळगता योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. अगदी साध्या साध्या गोष्टी पाळून पालक हे आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकणार आहेत. यात आहाराचीही महत्त्वाची भूमिका राहणार असून, घरचे ताजे जेवण हवे, यावर डॉक्टरांनी अधिक भर दिला आहे.

००००००००

बॉक्स

अशी घ्या बालकांची काळजी

- बालकांना संतुलित, पौष्टिक आहार द्यावा, नियमित देत असलेले अन्न हेच उत्तम आहे. बाहेरचे अन्न टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे टाळावे. नियमित लसीकरण करावे. पालकांनी आपण स्वत: बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक्स, पावसात भिजणे याबाबींपासून लहान मुलांना दूर ठेवावे. मुलांना कसलाही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

०००००००००

कोट

कोणतीही भीती न बाळगता पालकांनी आपल्या पाल्याची विशेष काळजी घेतल्यास कोरोनापासून बालकांना दूर ठेवता येते. लहान मुलांना संसर्ग होण्याचा अधिक धोका हा घरातील वरिष्ठांकडूनच असतो. अशा स्थितीत पालकांनी स्वत: सुरक्षित राहिल्यास बालकांना कोरोना होण्याचा धोका कमी होईल. कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे पालकांनी टाळलेच पाहिजे. आहाराच्या बाबतीत नियमितचा संतुलित, पौष्टिक आहार घेतला तरी पुरेसा आहे.

- डॉ. विजय कानडे, बालरोगतज्ज्ञ.

०००००

पावसाळ्यात मुलांना सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुलांना पावसात भिजू न देणे, नियमित लसीकरण यासह आपल्यापासून मुलांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. इतर पालकांनीदेखील बालकांना कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुलांना घराबाहेर खेळायला शक्यतोवर पाठवू नये. मास्क, हात स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

- प्रमोद ढाकरके,

पालक, वाशिम.