शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते झाले चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:53 IST

पावसामुळे ग्रामीण भागांतील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना आधार मिळून, प्रकल्पांत काही प्रमाणात जलसंचय होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे; परंतु या पावसामुळे ग्रामीण भागांतील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची मात्र चांगलीच वाताहत सुरु झाली असून, ग्रामीण भागांत रोगराई पसरण्याची भितीही निर्माण झाली आहे.मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून रस्ते फोडून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली. तथापि, पुन्हा या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. आता सततच्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहेच शिवाय वाहनेही फसत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांची चांगलीच त्रेधा तिरपीट डत आहे. ग्रामपंचायतने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आणि मंगरुळपीर शहरालगत असलेल्या शिंदे कॉलनीत मजबूत रस्त्यांचा अभाव आहे. सततच्या पावसामुळे या परिसरातील सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत. ग्रामस्थांच्या घरासमोर पथदिवेही दिसत नाहीत. चिखलमय झालेल्या रस्त्यावरूनच ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी येजा करावी लागत आहे. सतत घाणीतून येजा सुरू असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. तथापि, ग्रामस्थांच्या गैरसोयीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे ग्रामस्थांत रोषाचे वातावरण असून, ही समस्या दूर करण्याची मागणी रवि म्हातारमारे, ईश्वर पाटील, जोशी, विनोद पारधी, अनुराग भोयर, हरीश्चंद्र चव्हाण, गव्हाणे, वैभव हिवरकर, गोविंदराव धोत्रे, श्रीराम कालापाड, साबळे, भानुदास लुंगे, बाळू खेडकर, घनश्याम वाणी, खिराडे साहेब, खोंड, सावंत, प्रदिप अलोने, कर्पे, ऊगले, महल्ले, खडसे, हनुमान अव्हाळे यांनी केली आहे.(वार्ताहर)इंझोरी हे आमदार दत्तक गाव असून, या गावातील सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होताच मुख्य रस्त्यासह सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.-वनिता देविदास राठोडसरपंच, इंझोरी (ता. मानोरा)

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस