शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते झाले चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:53 IST

पावसामुळे ग्रामीण भागांतील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना आधार मिळून, प्रकल्पांत काही प्रमाणात जलसंचय होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे; परंतु या पावसामुळे ग्रामीण भागांतील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची मात्र चांगलीच वाताहत सुरु झाली असून, ग्रामीण भागांत रोगराई पसरण्याची भितीही निर्माण झाली आहे.मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून रस्ते फोडून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली. तथापि, पुन्हा या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. आता सततच्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहेच शिवाय वाहनेही फसत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांची चांगलीच त्रेधा तिरपीट डत आहे. ग्रामपंचायतने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आणि मंगरुळपीर शहरालगत असलेल्या शिंदे कॉलनीत मजबूत रस्त्यांचा अभाव आहे. सततच्या पावसामुळे या परिसरातील सर्वच रस्ते चिखलमय झाले आहेत. ग्रामस्थांच्या घरासमोर पथदिवेही दिसत नाहीत. चिखलमय झालेल्या रस्त्यावरूनच ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी येजा करावी लागत आहे. सतत घाणीतून येजा सुरू असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. तथापि, ग्रामस्थांच्या गैरसोयीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे ग्रामस्थांत रोषाचे वातावरण असून, ही समस्या दूर करण्याची मागणी रवि म्हातारमारे, ईश्वर पाटील, जोशी, विनोद पारधी, अनुराग भोयर, हरीश्चंद्र चव्हाण, गव्हाणे, वैभव हिवरकर, गोविंदराव धोत्रे, श्रीराम कालापाड, साबळे, भानुदास लुंगे, बाळू खेडकर, घनश्याम वाणी, खिराडे साहेब, खोंड, सावंत, प्रदिप अलोने, कर्पे, ऊगले, महल्ले, खडसे, हनुमान अव्हाळे यांनी केली आहे.(वार्ताहर)इंझोरी हे आमदार दत्तक गाव असून, या गावातील सर्वच रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होताच मुख्य रस्त्यासह सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.-वनिता देविदास राठोडसरपंच, इंझोरी (ता. मानोरा)

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस