शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रिसोड आगाराच्या रिसोड-मालेगाव बसफेऱ्या केल्या बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 4:36 PM

रिसोड आगाराने रिसोड ते मालेगाव मार्गावरील बससेवा ६ जूनपासून बंद केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे कारण समोर करीत रिसोड आगाराने रिसोड ते मालेगाव मार्गावरील बससेवा ६ जूनपासून बंद केली आहे. कोरोनामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागून आहे. लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली. मागील महिन्यात काही अटी, शर्तीवर जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासी बसेस वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली. त्यानुसार रिसोड आगारातून रिसोड ते मालेगाव मार्गावर चार बस फेऱ्या सुरू केल्या होत्या. सहाजिकच कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता अपेक्षित प्रवासी बस मध्ये प्रवास करत नव्हते. त्यातच बसफेºया कमी असल्याने व वेळापत्रक नसल्याने प्रवासी हे बसमध्ये प्रवास करण्यास धजावत नव्हते. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता अधिक देण्यात आल्याने १ जूनपासून लोकांची हळूहळू गर्दी वाढत असताना रिसोड आगाराने ६ जूनपासून रिसोड ते मालेगाव मार्गावरील बसफेºया प्रवाशी मिळत नसल्याचे कारण पुढे करून पूर्णत: बंद केल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन नाही अशा प्रवाशांची परवड होत आहे. सध्या खासगी प्रवाशी वाहतुकीस परवानगी नाही. त्यामुळे बºयाच नागरिकांना महामंडळाच्या बसेसचा आधार राहतो. महामंडळाने बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. सोमवारपासून बसफेऱ्या वाढविल्या जातीलप्रवाशांच्या सेवेसाठीच बसेस असून, प्रवाशीहिताला प्राधान्य देण्यात येते. रिसोड ते मालेगाव मार्गावर सुरू असलेल्या बस फेºयांना अपेक्षित प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे या मार्गावरील बसफेºया कमी करण्यात आल्या. सोमवारपासून बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे रिसोडचे आगार प्रमुख एस.एस. जगताप यांनी सांगितले. काही काळ लोकांनी एस टी बस मधून प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे एसटी बसला प्रवासी मिळत नव्हते हे सत्य आहे. मात्र आता हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. तसेच कामानिमित्त बाहेरगावी सुद्धा जात आहेत. रिसोड आगाराचा बस फेºया बंद करणे हा निर्णय चुकीचा आहे. -विश्वासराव सरनाईक,ग्रामस्थ, दापुरी

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटीShirpur Jainशिरपूर जैनRisodरिसोड