शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रिसोड येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित ! शेतक-यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 11:16 IST

वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर आता जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या कामाला गती मिळाल्याची माहिती ...

वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर आता जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या कामाला गती मिळाल्याची माहिती आहे. बाळखेड, धोडप व किनखेडा येथे बॅरेजेस व्हावे याकरिता मागील  २ वर्षापासुन आमदार राजेंद्र पाटणी, तत्कालिन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर हे शासनस्तरावर पाठपुरावा करीत होते. एका वर्षापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे लखनसिंग ठाकुर यांच्या निवासस्थानी आले असताना, शेतकºयांसह ठाकूर यांनी या बॅरेजसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची साद घातली होती. योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जलसंपदाच्या प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याने मध्यंतरी प्रशासकीय कार्यवाही ठप्प होती. यासंदर्भात आमदार पाटणी यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला तसेच लखनसिंह ठाकूर यांनी शिष्टमंडळासह १५ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. ना. गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर, २८ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन  यांच्या दालनात आमदार राजेंद्र पाटणी, लखनसिंह ठाकुर तसेच जलसंपदा विभागाचे मुुख्य अभियंता व पाटबंधारे अधिकाºयांसोबत चर्चा झाली. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश ना. महाजन यांनी दिले. या बॅरेजेसच्या अनुषंगाने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याने बॅरेजसंदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र