शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

रिसोड येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित ! शेतक-यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 11:16 IST

वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर आता जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या कामाला गती मिळाल्याची माहिती ...

वाशिम - पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील अडथळा दूर झाला असून, रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजला मंजूरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा येथील बॅरेजसंदर्भात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर आता जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या कामाला गती मिळाल्याची माहिती आहे. बाळखेड, धोडप व किनखेडा येथे बॅरेजेस व्हावे याकरिता मागील  २ वर्षापासुन आमदार राजेंद्र पाटणी, तत्कालिन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर हे शासनस्तरावर पाठपुरावा करीत होते. एका वर्षापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे लखनसिंग ठाकुर यांच्या निवासस्थानी आले असताना, शेतकºयांसह ठाकूर यांनी या बॅरेजसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची साद घातली होती. योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जलसंपदाच्या प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याने मध्यंतरी प्रशासकीय कार्यवाही ठप्प होती. यासंदर्भात आमदार पाटणी यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला तसेच लखनसिंह ठाकूर यांनी शिष्टमंडळासह १५ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. ना. गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर, २८ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन  यांच्या दालनात आमदार राजेंद्र पाटणी, लखनसिंह ठाकुर तसेच जलसंपदा विभागाचे मुुख्य अभियंता व पाटबंधारे अधिकाºयांसोबत चर्चा झाली. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश ना. महाजन यांनी दिले. या बॅरेजेसच्या अनुषंगाने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याने बॅरेजसंदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र