शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

२३ जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:47 IST

अमरावतील विभागातील अकोला वगळता इतर पाच जिल्ह्यांसह राज्यातील २३ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यास शासनाने ५ जुन रोजी मान्यता दिली आहे. अमरावतील विभागातील अकोला वगळता इतर पाच जिल्ह्यांसह राज्यातील २३ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे.हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पर्यायाने शेतकºयांना अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शेतकºयांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यास शासनाने ५ जुन रोजी मान्यता दिली आहे. अमरावतील विभागातील अकोला वगळता इतर पाच जिल्ह्यांसह राज्यातील २३ जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरात फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते; परंतु फळपिकांचे अपेक्षीत उत्पन्न न झाल्यास मोठा तोटाही सहन करावा लागतो. ही बाब विचारात घेऊन शेतकºयांच्या फळपिकांना विमा संरक्षण दिल्यास शेतकºयांचे आथिृक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी मदत होऊ शकेल. त्यासाठीच राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यातील २३ जिल्ह्यात ही संत्रा, मोसंबी, काजू, आंबा, डाळींब, केळी, द्राक्ष व प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी या ८ फळपिकांसाठी महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यापैकी १८ जिल्ह्यांत केवळ संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू या सहा पिकांसाठी ही योजना लागू असेल.  अशी आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये१) नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना विमा संरक्षण देणे.२) पिक नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.३) शेतकºयांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.४) कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातीही जोखमीपासून शेतकºयांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधी करण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे उद्देश साध्य करणे. 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र